Headlines

अंगणवाडी शिक्षिका शिवलिला यांचा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा

अक्कलकोट / प्रतिनिधी – सध्या भारतासह जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे.अशा जीवघेण्या कोरोनापासून गाव पातळीवर संरक्षणाचे काम अंगणवाडी सेविका व आशा वर्कर वर आहे. यामध्येच प्रतिवर्षी प्रमाणे शिवलिला दोडमनी मॅडम यांचा वाढदिवस आला.नुकताच काही महिन्यापुर्वी त्यांचा साखरपुढा झालेला आहे.त्यांचे होणारे पत्ती जयकुमार सोनकांबळे असुन त्यांचे शिक्षण बी.ए, एम.ए, बी.एड झालेत.शिवलिला मॅडम चे शिक्षण डी.एड,…

Read More

छोट्या आस्थापनेतील मजुरांना लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन द्यावे – संविधान प्रचारक

प्रतींनिधी / बार्शी – छोटे दुकाने,व्यवसाय व हॉटेलमधील कर्मचारी व वेटर यांना कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊनच्या काळातील किमान वेतन संबंधित मालकाने द्यावे ह्या आशयाचे निवेदन संविधान प्रचारक मनीष देशपांडे यांच्या वतीने मा.मुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी सोलापूर तसेच तहसीलदार बार्शी यांना ईमेल द्वारे  देण्यात आले.असे निवेदन सपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रचारक यांच्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की लॉक…

Read More

शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

      पंढरपूर, दि.18:- गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी- कोरपर्शी  जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने शहीद झाले. त्यांच्यावर आज मूळ गावी पुळूज येथे शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुळूज ग्रामस्थांनी व उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.            कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतराचे पालन करीत गावकरी अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. आज…

Read More

टोमॅटो पिकावरील नवीन तिरंगा विषाणूच्या टी.व्ही.-९ वरील दि.१५ मे, २०२० रोजीच्या बातमी बदल

महाराष्ट्र राज्यात टोमॅटो या भाजीपला पिकाची लागवड प्रामख्याने नाशिक,अहमदनगर,पुणे औरंगाबाद, नागपुर लातूर या जिल्हयात करण्यात येते.  राज्यात टोमॅटो पिकाचे सर्वसाधारण क्षेत ३३९५० हेक्टर असुन त्यापासुन ८,४८,५५० मे.टन इतके उत्पादन मिळते. अहमदनगर जिल्हयातील संगमनेर व अकोला या तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोवरील नवीन तिरंगा विषाणुजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त असल्याची बातमी मराठी वृत्त वाहिनी टी.व्ही -९ वर…

Read More

हलणारे हात आणि डोळ्यात दाटलेली आतुरता…

सोलापूर, दि. 17 – रेल्वेच्या प्रत्येक खिडकीतून हात हलत होते आणि प्रत्येक खिडकीतल्या डोळ्यात गावी कधी एकदा पोहोचतो आहे.. याचीच आतुरता लागून राहीली होती. सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज दुपारी, असे चित्र होते. लाकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील मजूर, विद्यार्थी, पर्य़टक इत्यादी  नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे आज ग्वाल्हेरसाठी सोडण्यात आली.  सोलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी दोन वाजून…

Read More

यादगार फाउंडेशनच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप

                                                      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, डॉक्टर , सफाई कर्मचारी यांच्या सह एस . टी चे कर्मचारी सुद्धा काम करीत आहे दरम्यान एसटी  तर्फे आता परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडवण्याच्या…

Read More

परराज्यातील 166 नागरिक एस.टी. बसने रवाना

सोलापूर; दि.17- परराज्यातील 166 नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एसटी महामंडळ तसेच जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या लगतच्या सीमा तपासणी नाक्यापर्यंत पोहोच करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अधिकारी  संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या निरीक्षणाखाली छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील एकूण 56 प्रवाशांना पाणी, जेवण व बसची सोय करुन देण्यात आली….

Read More

आषाढी वारी बाबत तीस मे नंतर निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर, दि 15 : पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत तीस मे नंतर निर्णय घेतला जाईल,  असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत व्ही. सी.द्वारे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पंढरपूरच्या नगराध्यक्षा…

Read More

सोलापूरकरांची साथ महत्वाची : पालकमंत्री भरणे

सोलापूर, दि 15 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सोलापूरच्या नागरिकांची साथ महत्वाची आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथील विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

मॉन्सूनच्या संभाव्य आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या सूचना

सोलापूर दि. 15 : येणाऱ्या मॉन्सूनमधील संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क असणे आवश्यक आहे. याकरिता सर्व शासकीय यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करावे. याबाबतचे आराखडे अद्यावत करून संभाव्य नैसर्गिक आपत्तीची माहिती नागरिकांना तत्काळ मिळावी, यासाठी गाव व तालुका पातळीवर नागरिकांचे आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज दिल्या….

Read More