Headlines

“वारकऱ्यांचा जीव महत्वाचा, पैशाचा विचार करू नका, मी खर्च करतो, तुम्ही फक्त…”; अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना फोन | Video Pick up truck loses control hits Warkaris CM Eknath Shinde Called for health updates injured in Sangli offered money for treatment scsg 91

[ad_1]

सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश.जखमी वारकऱ्यांवर सर्वोत्तम उपचार करा, पैशांचा विचार करु नका, त्यांचा जीव महत्वाचा आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चाने उपचार करतो असंही या अधिकाऱ्यांना सांगितलंय. वारकऱ्यांचा जीव महत्वाचा, पैशाचा विचार करू नका, मी सगळा खर्च करतो, तुम्ही फक्त त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यासंदर्भात काळजी घ्या असे निर्देश शिंदेंनी फोनवरुन दिले.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ मंगळवारी एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात १७ वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज शासकीय रुग्णालय आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नक्की पाहा >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन केला. फोनवरुन मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

पाहा व्हिडीओ –

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण शिंदेंनी ‘करुन दाखवलं!’

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आषाढी वारी अगदी दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं.

जखमी वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द मुख्यमंत्री धावून आल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *