Headlines

पुण्याच्या मेट्रोमध्ये सोनाली कुलकर्णीचा ‘गरमागरम’ डान्स, पाहा व्हिडिओ

[ad_1]

मुंबईः मुंबईत म्हणा किंवा पुण्यात म्हणा… सगळीकडे पाऊस पडत असला आणि वातावरण गार असले तरी आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘गरमा गरमा’ या गाण्याने मात्र सध्या वातावरण चांगलेच हॉट झाले आहे. याचे कारण नुकत्याच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तमाशा लाईव्ह मधील ‘गरमा गरमा’ हे नवे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले असून तमाशा लाईव्हची अख्खी टीम ‘गरमा गरमा’ गाण्यावर पुणेकरांसह थिरकली आहे. नुकतेच हे गाणे पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकावरच प्रदर्शित करण्यात आले.

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाणी एकमागून एक प्रदर्शित होत आहेत आणि सगळ्यांकडूनच त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. संजय जाधवांनी सांगितलं की, “प्रेक्षकांच्या, प्रवाशांच्या उपस्थितीत, ‘गरमा गरम’ हे गाणे मेट्रो स्थानकात प्रदर्शित होणे, ही आनंद देणारी गोष्ट आहे. प्रमोशनचा हा एक वेगळा प्रकार आहे. यामुळे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते आणि त्यांच्या थेट प्रतिक्रिया मिळतात. ‘तमाशा लाईव्ह’ हा खऱ्या अर्थाने वेगळा चित्रपट आहे. आजच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता, चित्रपटालाही असाच भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.” 
यावेळी गायिका वैशाली सामंत यांनी यावेळी गाणे गायले आणि उपस्थितांना नाचायला भाग पाडले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या जबरदस्त नृत्याने चाहत्यांच्या भुवया पुन्हा एकदा वर करायला लावल्या. 

‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक मेजवानी आहे. प्रत्येक गाण्याचा प्रकार वेगळा आहे. संगीतातील सगळे प्रकार एकाच चित्रपटात वापरल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. ‘गरमा गरम’ गाणेही अप्रतिम बनवले आहे. अमितराज यांचे संगीत, क्षितीज पटवर्धन यांचे शब्द आणि यात भर म्हणजे उमेश जाधव यांचे नृत्य दिग्दर्शन. एवढी तगडी संगीत टीम असल्यावर हे संगीत प्रेक्षकांना आवडणारच. आज मेट्रो स्थानकातील प्रवाशांचे प्रेम पाहता ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटगृहात ‘गरमा गरम’ कमाई करणार हे नक्की.’

एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित ‘तमाशा लाईव्ह’चे सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स , डॉ. मनीषा किशोर टोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर अरविंद जगताप यांचे संवाद लाभले आहे. येत्या 15 जुलैपासून ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *