Headlines

nana patole criticized shinde government on 100 days complete spb 94

[ad_1]

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले आहेत. या १०० दिवसांत ‘ईडी’ सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच शेतकरी आत्महत्या, महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव यावरूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – दोन वर्षांपासून सरकार पाडण्याची तयारी सुरू होती म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ‘ईडी’ सरकारने १०० दिवसांत केले”,अशा घणाघाती नाना पटोले यांनी केला आहे.

“अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप पंचनामे झाले नाहीत. थातूरमातूर पंचनामे केले जात आहेत. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आमच्या सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर ५० टक्के कमी करावे, अशी मागणी करणारे आता मूग मिळून गप्प बसले आहेत. सीएनजी पीएनजीवरचे कर आमच्या सरकारने कमी केले पण या सरकारने कोणतेही कर कमी केले नाहीत. उलट सीएनजी ८४ रुपये किलोपर्यंत वाढवण्याचे काम केले. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हितासाठी, दिल्लीच्या आदेशानुसार काम करत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे” , अशी टीकाही नाना पोटोल यांनी केली.

हेही वाचा – बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा कारभार…”

“महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच या सरकारला काम करु दिले गेले नाही. सातत्याने सरकारच्या कामात खोडा घालणे, राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल यासाठी लव्ह जिहाद, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा सारखे मुद्दे जाणीवपूर्वक काढले गेले. मविआ सरकार, महाराष्ट्र व मुंबईला बदनाम करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. राजभवनच्या माध्यमातूनही समांतर सरकार चालवले गेले. कोरोनाच्या संकटातच आमच्या सरकारी दोन वर्ष गेली, पण जगाला हेवा वाटावा असे काम करोना संकटात आमच्या सरकारने केले. या काळात सरकार पाडण्यातच विरोधक व्यस्त होते. शेवटी कटकारस्थान करून शिंदे सरकार आले. सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारच खुलेआमपणे हातपाय तोड्याची भाषा करू लागले, पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकावण्याची भाषा सुरु झाली. दादरमध्ये गणेशोत्सव काळात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केला पण या पैकी एकाही घटनेत कायदेशीर कारवाई करुन सरकारी गुंडगिरीला चाप लावला नाही”, असेही पटोले म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *