Headlines

‘Ferrari विकली, बंगला सोडला…’; आमिरच्या भाच्यानं का केला इतका त्याग? पाहा आता कसा जगतोय

[ad_1]

Imran Khan : बॉलिवूड अभिनेता इमरान खान गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आता चित्रपट आणि लाइमलाइटपासून दूर झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य हे बदललं आहे. मात्र, आता इमराननं बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला. आता असं म्हटलं जातंय की ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाच्या सीक्वलमधून इमरान कमबॅक करणार आहे. 

इमरान खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, 2016 मध्ये त्याच्या आयुष्यातील वाईट काळ सुरु झाला होता आणि तेव्हा त्यांनं अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. तर वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की आता तो त्याची लेक इमारासाठी स्वत: ला ट्रॅकवर आणायचं आहे. जेव्हा त्यानं स्वत: ला चित्रपटसृष्टी पासून स्वत: ला लांब केलं, तेव्हा त्याच्या आयुष्यात अनेक बदल घडले. गेल्या काही वर्षात इमरान खाननं त्याची फरारी विकली आणि पाली हिलमध्ये असलेला बंगला सोडून तो आता अपार्टमेंटमध्ये राहतो. लक्झरी लाइफ सोडून इमरान खान एक साधारण आयुष्य व्यथित करत आहे. 

इमरान खाननं यावेळी सांगितलं ‘2016 मध्ये मी खूप वाईट काळातून जात होतो. त्यावेळी मला काही सुचत नव्हतं. सगळं बिथरलंय असं मला जाणवत होतं. नशिबानं मी अशा एका इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो ज्यामुळे मी आर्थिक रुप्या मजबूत झालो. त्यामुळए जेव्हा मी 30 वर्षांचा झालो तेव्हा मला पैशांची काहीही चिंता करण्याची गरज नव्हती. त्यावेळी हे माझं करिअर नव्हतं. कारण त्याविषयी मी इतका एक्सायटेड होऊन विचार करत नव्हतो, जेणे करून मी त्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करेन.’

पुढे वैवाहिक आयुष्याविषयी बोलत इमरान म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वीच मी वडील झालो आणि मला हे जाणवलं हे काही तरी विशेष आणि महत्त्वाचं आहे. या गोष्टीला मी गांभीर्यान घेतो. माझ्या लेकीसाठी म्हणजे इमारासाठी मला बेस्ट बनायचं आहे. मी निर्णय घेतला की आता अभिनय होणं माझं काम नाही . आता मला स्वत: वर काम करायचं आहे. माझ्या लेकीसाठी हेल्दी आणि फीट राहणं गरजेचं आहे.’ 

हेही वाचा : मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी पोलिसांना द्यावी लागली लाच; सेलिब्रिटीने शेअर केला मन हेलावणारा अनुभव

इमरान खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी कट्टी-बट्टी चित्रपटात दिसला होता. अभिनेत्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर 2011 मध्ये त्यानं अवंतिका मलिकशी लग्न केलं. तर 2014 मध्ये त्या दोघांच्या आयुष्यात इमारा आली. त्यानंतर 2019 मध्ये इमरान आणि अवंतिकाचा घटस्फोट झाला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *