Headlines

दुबईत फिरणारा सिद्धार्थ मिस करतोय गावचं जेवण… शेअर केली पदार्थांची यादी; नेटकरी म्हणाले, ‘कांदा राहिला की’

[ad_1]

Siddharth Chandekar : आपण घरापासून लांब कुठेही गेलो तरीसुद्धा आपल्याला आपलं घरंच जेवणं हे फारच आवडतं असतं त्यातून परदेशात गेलो की सुद्धा आपण आपल्या घरचं जेवण कुठे मिळेल याच्या प्रतीक्षेत असतो. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट ही जोरात चर्चेत आली आहे. यावेळी त्यानं मराठमोळ्या पदार्थांची यादीच जाहीर केली आहे. यावेळी म्हणूनच त्याची फार जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेता सध्या आपली बायको मिताली मयेकरसोबत दुबईची भ्रंमती करतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी तो आपल्या दुबईचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो आहे. त्याचे फोटो हे चांगले व्हायरल झाले आहेत. सध्या त्यानं या पोस्टमध्ये काय लिहिलंय हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

”आदल्या दिवशीचा चिकन-मटणाचा किंवा शेव भाजीचा रस्सा, शिळ्या भाकरीचा कुस्करा, मिरची आणि लसणाचा ठेचा आणि शेवटी घट्ट झालेली शेवयाची खीर, बास पुरेसं आहे.” असं लिहित त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं कॅप्शन दिलं आहे की, ”अजून नको काही”. सध्या तो आपले दुबईचे फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट करतो आहे त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्याच्या या पोस्टखाली नानाविध कमेंट्स आल्या आहेत. त्यामुळे नेटकरीही त्याच्या या पोस्टवर भलतेच खुश झाले आहेत. आपण कुठेतरी बाहेर गेलो की आपल्यालाही अशाचप्रकारे काहीतरी हटके खायची इच्छा असते परंतु त्यातूनही आपल्याला आपल्या घरच्या पदार्थांची आठवणही आल्याशिवाय राहत नाही. 

हेही वाचा : नव्या घरात ऋतुजा बागवेनं लावलाय ‘या’ खास व्यक्तीचा फोटो, म्हणाली, ‘सकाळी उठल्यावर त्याचा चेहरा…’

काही दिवसांपुर्वी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची स्पेन ट्रीप बरीच गाजली होती. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. मध्यंतरी मितालीही आपल्या मित्र आणि मैत्रीणींसोबत ही मस्तपैंकी मलेशिया, थायलंडला फिरायला गेली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा होती. आता ते दोघं मस्त दुबईमध्ये फिरत आहेत. त्यांचे मस्ती, धमाल करणारे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यातून ते दोघं दुबईच्या वाळवंटातही गेले होते. 

यावेळी नेटकरी म्हणाले की, ‘स्वर्गसुख’, ‘मनातलं बोललास तु’, ‘मनं तृप्त होऊन जाते’, ‘मटणं खाल्ल्यानंतर खीर कोण खाईल?’, ‘ पण हे सगळ आदल्या दिवशी बनवून ठेवणार कोण’. त्यानंतर एकानं लिहिलंय की, ‘कांदा राहिला यात’. सोबतच काहींनी म्हटलंय की, ‘ही पोस्ट वाचून भुक लागली’  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *