केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध भारत बंद, सोलापूर बंद यशस्वी करा! माकपाचे आवाहन!
सोलापूर :- केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक जनता विरोधी प्रतिगामी धोरणे जाणीवपूर्वक अमलात आणत आहेत. हे देशासाठी अत्यंत घातक व अधोगतीकडे नेण्याचे द्योतक आहे. लाखो टन धान्य असूनही रास्तधान्य व्यवस्था जमीनदोस्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव अत्यल्प असताना पेट्रोल-डीझेलची अनियंत्रित दरवाढ करण्यात आली. यापासून सरकारला २५ लाख कोटी रुपये नफा झाला. परंतु…