Headlines

TMKOC: ‘कोणी उगाच बेवफा होत नाही…’; Taarak Mehta सोडल्यानंतर लोकप्रिय कलाकाराची संतप्त प्रतिक्रिया

[ad_1]

TMKOC: तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेतील कलाकारांमुळे सुरू असलेला वाद अद्यापही सुरू आहे. या मालिकेतील जुने कलाकार मालिका का सोडून गेले. यावर अजूनही चाहत्यांमध्ये वाद आहे. यावर मालिकेच्या निर्मात्यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना कलाकारांच्या मालिका सोडून जाण्यावर भाष्य केले होते. जुने कलाकार या मालिकेतून सोडून गेल्यामुळे नव्या कलाकारांनी मालिकेत एन्ट्री झाली होती. परंतु आता जुन्या कलाकारांसोबत नवे कलाकारही मालिका सोडून जाण्याच्या विचारात आहेत तर काहींनी ही मालिका सोडल्याचेही कळते आहे. दया बेनची (Dayaben Cancer) भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तर गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत परतल्या नाहीत. तेव्हा अशावेळी मालिकेत नक्की काय सुरू आहे याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाहीये. त्यातून आता मालिकेच्या निर्मात्यांचे आणि तारक मेहता ही भुमिका साकारणाऱ्या कलाकाराचे पुन्हा एकदा एक नवे वक्तव्य समोर आले आहे. 

नुकतंच तारक मेहता यांची भुमिका साकारणारे शैलेश लोढा (Shaliesh Lodha) यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडली होती. त्यांच्या जागी आता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) हे भुमिका करत आहेत. शैलेश लोढा यांना पुन्हा एकदा त्यांनी तारक मेहता ही मालिका का सोडली याबद्दल विचारण्यात आले आहे त्यावर त्यांनी पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. परंतु अद्यापही त्यांनी अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. 

हेही वाचा – Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली… आता घेणार ‘इतके’ कोटी रूपयांचं मानधन?

त्यांना मालिका सोडल्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, भारतीय प्रेक्षक खूप भावनिक आहेत. मी स्वत:ला सगळीकडे इमोशलन फूल म्हणतो. जेव्हा शैलेश लोढा यांना शो सोडण्यामागचं कारण विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘कुठली तरी मजबुरी असावी, जशी बेवफाई कोणी करत नाही किंवा उगाच कोणी बेवफा होत नाही’. त्याचबरोबर योग्य वेळ आल्यावर त्यामागचे कारण सांगेन, असेही ते म्हणाले.   

विशेष म्हणजे सचिन श्रॉफ सध्या तारक मेहताची भूमिका साकारत आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की, ही व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे साकारण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. यादरम्यान ते म्हणाले होते की, साखर ज्या प्रकारे चवीनुसार पाण्यात विरघळते, त्याच पद्धतीने मी या पात्राला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन.  

हेही वाचा – टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल… नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

शैलेशने शो सोडल्यानंतर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र आता त्यांनी या विषयावर मौन तोडले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबत मोकळेपणाने भाष्य केले. मात्र हा शो सोडण्याचे खरे कारण त्यांनी नीट स्पष्ट केलेले नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *