बार्शी / प्रतिंनिधी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शी शहर व तालुक्यातील युवा नेते राजेंद्र गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. राजेंद्र गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) मध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. युवा नेते राजेंद्र गायकवाड यांनी मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता .
राष्ट्रवादीच्या बार्शी शहरातील व तालुक्यातील अंतर्गत घडामोडी व अंतर्गत विरोध याला कंटाळून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. – राजेंद्र गायकवाड
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
राजेंद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना मोफत वृद्धांसाठी महिलांसाठी बस सेवा , कोरोना महामारी च्या काळात मोफत ऑक्सिजन बस सेवा लर्निग मोफत लायसन शिबिर असे विविध कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीला बळ देण्याचे काम केले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी राजेंद्र गायकवाड यांच्या कार्याला व कामाला बळकटी देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड केली.
.