Headlines

‘…पुरूषाच्या पावतीची गरज नाही’; दुसऱ्या लग्नाबद्दल तेजस्विनी पंडितचं परखड उत्तर

[ad_1]

Tejaswini Pandit on Marriage: मराठी कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची बरीच चर्चा रंगलेली असते. त्यांच्या बॉयफ्रेंडची चर्चा असते नाहीतर त्या लग्न कधी करणार याचीही सोशल मीडियावरून चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे आणि ती म्हणजे तेजस्विनी पंडित. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठीतली सर्वात आघाडाची अभिनेत्री आहे. तिनं मराठी मालिका, चित्रपट आणि वेबमालिकांतून सामर्थ्यवान भुमिका केल्या आहेत. सोशल मीडियावरही तिचे असंख्य फॉलोवर्स असून ती इन्स्टाग्रामवरही सक्रिय आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे तिच्या लग्नाची. यावेळी तिनं दिलेल्या एका मुलाखतीतून आपल्या लग्नाविषयीचा खुलासा केला आहे. करिअरच्या शिखरावर असलेली तेजस्विनी लग्न कधी करणार, असा प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर तिनं स्पष्ट उत्तर दिले आहे. 

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत ती असं म्हणाली की, ”मी आता सेटल आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे सक्षमरित्या उभी आहे. मला कुणाशी लग्न करणं किंवा आयुष्यात पुरूष असणं हे माझ्या सेटल होण्याचं कारण नाही किंवा उदाहरणंही नाही. मी सेटल आहे. मी खूश आहे. मी मजेत आहे. मी काम करतेय आणि मी माझ्या परिवाराला सांभाळते आहे. मी करिअर करतेय. मी अभिनय करतेय आता मी निर्मिती क्षेत्रातही सक्रीय आहे. मी व्यावसायिकादेखील आहे. मी खूप गोष्टी करते आहे आणि त्याच्यासाठी मला कोणत्याही पुरूषाच्या पावतीची गरज नाही.” असं तिनं आपलं स्पष्ट मतं मांडलं आहे. 

हेही वाचा : VIDEO: रावण दहनाच्या वेळी कंगनाचा निशाणा चुकला अन् पुढे…

आज अनेक महिला या आपल्या पायावर कणखरपणे उभ्या आहेत. लग्न आणि करिअर यावरील त्यांची मतंही फार स्पष्ट आहेत. त्यामुळे सर्वच स्तरावर त्या पुर्णपणे आपल्या परीनं प्रयत्न करताना दिसत आहेत आणि यशस्वीही होत आहेत. तेजस्विनी पंडितचंही यासाठी उदाहरणं घेता येईल. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही आपल्या करिअरच्या पीकवर आहे. काही दिवसांपुर्वी आलेली ‘अथांग’ या वेबमालिकेची तिनं निर्मिती केली होती. ‘अग्गं बाई अरेच्चा’, ‘फॉरेनची पाटलीण’, ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘कॅंडल मार्च’, ‘एक तारा’, ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘नाथा पुरे आता’ अशा चित्रपटांतून तसेच ‘एकाच ह्या जन्मी जणू’, ‘तुझं नि माझं घर श्रीमंताचं’ ‘समांतर’, ‘रानबाजार’ अशा मालिका, वेबमालिकांतून तिनं कामं केली आहेत. 

यावर्षी आलेल्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटातूनही ती दिसली होती. विकीपिडियाच्या माहितीनुसार, तेजस्विनीचे लग्न यापूर्वी झालेले होते. आपल्या लहानपणीच्या मित्राशी 16 डिसेंबर 2012 रोजी लग्न केले होते. इंडस्ट्रयलिस्ट रामेश्वर रूपचंद बोपचे यांचा मुलगा भुषण बोपचे याच्याशी तिचे लग्न झाले होते. परंतु त्यानंतर ते वेगळे झाले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *