Headlines

‘या’ कारणाने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात Rohit sharma होता टीमबाहेर; अखेर खरं बाहेर आलंच!

[ad_1]

मुंबई : टीम इंडियने आशिया कपच्या (Asia Cup 2022) शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या (IND vs AFG) टीमचा धुव्वा उडवला. यामध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीममध्ये दिसला नाही. कालच्या सामन्यात केएल राहुल टॉससाठी आला. यावेळी रोहित शर्मा सामन्यासाठी उपलब्ध नसण्याचं खरे कारण उघड केलं. याशिवाय काल टीममध्ये अनेक बदलही पाहायला मिळालेत.

टॉससाठी आलेल्या कर्णधार केएल राहुलने सांगितलं की, कर्णधार रोहित शर्माला विश्रांतीची गरज होती. टीम मॅनेजमेंटला देखील असंच वाटत होतं. कारण टी 20 वर्ल्डकप आगामी काळात आहे आणि मॅनेजमेंटला खेळाडू फ्रेश हवेत.”

“रोहित शर्माला विश्रांती घ्यायची आहे. या परिस्थितीत बॅक टू बॅक सामने खेळणं सोपं नाही, असं केएल राहुलने सांगितलं आहे.

टॉसवेळी केएल राहुल पुढे म्हणाला, “चहल, रोहित आणि हार्दिक या सामन्याचा भाग नाहीत. चहर, कार्तिक आणि अक्षर यांना टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.”

टीम इंडियाचा शेवटच्या सामन्यात मोठा विजय

टीम इंडियाने आशिया कप 2022 मधला शेवटचा सामना जिंकला. अफगाणिस्तान विरुद्ध भारताने 101 रनने विजय मिळवला. पण हे दोन्ही संघ 2022 च्या आशिया कपमधून बाहेर पडले आहेत. 

टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानचा संघ 8 गडी गमावून केवळ 111 धावाच करू शकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 122 धावा केल्या. विराट कोहलीच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमारचा कहर गोलंदाजीत पाहायला मिळाला. भुवनेश्वर कुमारने आपल्या 4 षटकात फक्त 4 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *