Headlines

प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलचा घटस्फोट; सोशल मीडियावर दिली माहिती

[ad_1]

मुंबई : आजकाल नातं दीर्घकाळ टिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनेकजण वेगळे होत आहेत.  असाच काहीसा प्रकार टीव्हीच्या दोन प्रसिद्ध चेहऱ्यांसोबत घडला आहे. नुकताच अभिनेता करण वीर मेहरा आणि निधी यांचा घटस्फोट झाला आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. पण काही महिन्यांतच त्यांच्या वैवाहिक जीवन विस्कळित झालं. आणि आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे करण मुंबईत टीव्ही शो ‘बातें कुछ अंकही सी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर अभिनेत्री सध्या तिच्या कुटुंबासोबत  बैंगलौरमध्ये राहत आहे.   

‘ईटाईम्स’च्या वृत्तानुसार निधीने घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, ‘हो, तीन महिन्यांपूर्वी आमचा घटस्फोट झाला आहे. वर्षभरापूर्वी आम्ही वेगळे झालो होतो. मला विश्वास आहे की, कोणत्याही नात्यात दररोज भांडणं ही होतातच आणि ती असह्य होतात. आणि अशा परिस्थितीत आपण कधीही एकत्र राहू शकत नाही. वैवाहिक जीवनात मानसिक शांती, एकमेकांबद्दल आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे. तसं, करण वीर मेहराचं हे दुसरं लग्न होतं. त्याने 2009 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण देविकासोबत पहिलं लग्न केलं आणि 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

निधीने सांगितलं घटस्फोटाचं कारण 
निधी पुढे म्हणाली, ‘रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अनेक गोष्टींचा खोलवर विचार करायला हवा. दुःखाची गोष्ट म्हणजे, आजही लोकांना काही विशिष्ट वागणूक आणि माणसांबद्दल माहिती नाही ज्यामुळे नातेसंबंध खराब होतात. निधीने ‘मेरे डॅड की दुल्हन’, ‘किस्मत का खेल’ आणि ‘श्रीमद भागवत महापुराण’मध्ये काम केलं आहे.  

अभिनयातून ब्रेक घेत निधी करतेय हे काम 
निधी पुढे म्हणाली, ‘मुंबई नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील. मला अभिनयाची खूप आवड आहे आणि तो नेहमीच माझ्या आयुष्याचा भाग असेल. पण सध्या मी माझा ब्रेक टाईम एन्जॉय करत आहे. आणि माझ्या इंटीरियर डिझायनिंग करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. मला बंगलोरचे हवामान, खाद्यपदार्थ, संस्कृती, सगळं काही आवडतं. मला जेव्हा जेव्हा अभिनयाची संधी मिळेल तेव्हा मी मुंबईत येईन.

एप्रिल 2023 मध्येच दोघांमधील मतभेदाबाबत अनेक बातम्या आल्या होत्या. ‘ईटाईम्स’च्या वृत्तानुसार, तेव्हापासून दोघंही एकत्र राहत नव्हते. अभिनेत्रीने सोशल मीडियावरून करणचे सर्व फोटो डिलीटही केले होते. पण करण आणि निधीने याबद्दल कधीच काहीच सांगितलं नाही. ते एकत्र येतील अशी चाहत्यांना आशा होती. त्यांची पहिली भेट 2008 मध्ये एका जाहिरातीदरम्यान झाली होती. त्यानंतर दुसऱ्या प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान ते तीन वर्ष एकमेकांना भेटले. आणि मग त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि या दोघांनी लग्नगाठ बांधली.   



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *