[ad_1]
महाराष्ट्र लवकरच ७ ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस –
महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. एक राष्ट्र म्हणून आपण प्रगती करत राहिलो, तर आपण लवकरच ७ ट्रिलीयन अर्थव्यवस्था होऊ शकतो, असा विश्वास देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच आम्ही २०१५ मध्ये २०३० पर्यंत ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प आम्ही पुढे नेणार असल्याचेही ते म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालणारे मॉडेल घेऊन येणार आहे. हे मॉडेल सर्वसमावेशक असेल.”, तसेच आम्ही राज्यातील पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प सुरू केले असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा – मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले “सूरतेला जाण्यापेक्षा…”
[ad_2]