Headlines

Aishwarya-Aamir ने कधीही एकत्र चित्रपट का केला नाही? अखेर ते सत्य समोर आलंच

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याने अनेक लोकांना वेड लावले आहे. त्याचबरोबर ऐश्वर्याचं अभिनय देखील कमाल आहे. ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले, जे अजूनही चर्चेत आहेत. ऐश्वर्या आता बॉलिवूडपासून लांब असली तरी,  तिच्या फॅन फॉलोईग्सवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. लोक अजूनही तिच्या सौंदर्याचे वेडे आहेत. ऐश्वर्या सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अभिषेक बच्चन सोबत लग्न केल्यानंतर त्या दोघांना एक गोंडस मुलगी देखील आहे.

नुकतीच ऐश्वर्या रायशी संबंधित एक रहस्यमय गोष्ट समोर आली आहे, जी चर्चेचा विषय बनली आहे. तसेच लोकांना याबाबत अनेक प्रश्न देखील पडले आहेत.

ऐश्वर्या रायने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तर अनेक अभिनेत्यांना ऐश्वर्यासोबत काम करण्याची इच्छा देखील होती. परंतु असे असूनही ऐश्वर्याने एका अभिनेत्यासोबत कधीही काम केलं नाही. हा अभिनेता आहे आमिर खान.

आमिर खान हे बॉलिवूडमधलं मोठं नाव आहे आणि त्याच्या चित्रपटाची निवडही चांगली आहे. मग असे असूनही ऐश्वर्याने त्याच्यासोबत कधीही काम का केलं नाही? या बाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.

या मागचं कारण काय?

ऐश्वर्याला आमिर खान अजिबात आवडत नाही. एवढेच नाही तर आमिरला देखील ऐश्वर्याचा स्वभाव पटत नाही.

अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, आमिर खान हा खूप विनोदी व्यक्ती आहे. जो त्याच्या को-स्टार किंवा अभिनेत्रींसोबत मजा-मस्ती करत असतो, तो बऱ्याचदा विनोद देखील करतो आणि त्याचं हेच वागणं ऐश्वर्याला पटत नाही. तसेच या दोघांनाही एकमेकांचं वागणं आवडत नसल्यामुळे या दोघांनी कधीही एकत्र सिनेमा केला नाहीत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *