Headlines

बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांवर सलमान खानने अखेर सोडलं मौन, म्हणाला “मी त्यांचा…”

[ad_1]

Salman Khan on Death Threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) गेल्या काही काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) गँगकडून जाहीरपणे सलमान खानला धमकी देण्यात आली असून, यानंतर त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोईने सलमानला धमकी देण्याचं कारणही सांगितलं आहे. दरम्यान, सलमान खानने प्रथमच याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानने दिलेल्या उत्तराचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. 

सलमान खानने काय म्हटलं?

सलमान खानने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याला तू सगळ्यांचा भाईजान आहेस, मात्र तुला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात त्यासंबंधी काय वाटतं असं विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की “मी संपूर्ण भारताचा भाईजान नाही. मी अनेकांचा जीवही आहे. भाईजान त्यांच्यासाठी आहे जे भाऊ आहेत आणि त्यांच्यासाठी ज्यांना मी बहिण बनवू इच्छितो”. 

सलमान खानच्या उत्तराचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. लोकांना त्याचं हे उत्तर आवडलं आहे. लोकांनी त्याच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे 

लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमान खानला धमकी

गँगस्टर गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिष्णोई गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानच्या मागावर आहेत. सलमानला कधी ई-मेल पाठवण्यात आला तर कधी नोटेवर लिहून धमकी देण्यात आली. सलमान मिळणाऱ्या या धमक्यांमुळे त्याचे चाहते मात्र चिंतेत आहे. दुसरीकडे पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली आहे. 

सलमान पाठवण्यात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये प्रकरण बंद करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. “गोल्डीला तुला बॉस म्हणजेच सलमान खानशी बोलायचं आहे. त्याने मुलाखत पाहिली असेलच, नसेल पाहिली तर पाहायला सांग. प्रकरण मिटवायचं असेल तर चर्चा करायला सांग. समोरासमोर बोलायचं असेल तर तसंही सांग. आता वेळ आहे तोवर सांगितलं आहे. पुढच्या वेळी झटका मिळेल,” असं मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं. 

याआधी देण्यात आलेल्या धमकीत सलमान खानला सिद्धू मुसेवालाप्रमाणे हाल करण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानवर हल्ल्याच्या अनेक योजना आखल्या होत्या. त्याच्या फार्महाऊस आणि घराची रेकीही करण्यात आली होती. पण या सर्व योजना फोल ठरल्या. 

लॉरेन्स बिष्णोईचा सलमानवर राग का?

1998 मध्ये सलमान खानने काळवीटची शिकार केली होती. याप्रकरणी लॉरेन्सने त्याने माफी मागावी अशी मागणी केली आहे. लॉरेन्स हा बिष्णोई समाजाचा असल्याने काळवीट शिकारप्रकरणी तो सलमानच्या मागावर आहे. त्याला सलमान खानला धडा शिकवायचा आहे. त्याने बिष्णोई समाजाची माफी मागावी अशी त्याची मागणी आहे.    

सलमान खानचा ‘किसी का भाई, किसी की जान’ चित्रपट 21 एप्रिलला रिलीज होणार आहे. हा एक फॅमिली एंटरटेनमेंट असणार आहे. या चित्रपटात सलमानसह पूजा हेगडे, वेंकटेश, शहनाज गिल, राघव जुयाल, भूमिका चावला, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, पलक तिवारी असे अनेक अभिनेते दिसणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *