Headlines

वर्षभरापूर्वी साखरपूडा, काही महिन्यांपूर्वी लग्न रद्द; जाणून घ्या वैशाली ठक्कर विषयी ‘त्या’ गोष्टी

[ad_1]

मुंबई : छोट्या पडद्यावरील जवळपास सर्व मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री वैशाली ठक्करनं इंदौर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या एक वर्षापासून ती याच शहरात राहत होती. तिच्या निधनानं छोट्या पडद्यावरील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. वैशालीनं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली होती. पोलिसांनी अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण प्रेमप्रकरण असल्याचे सांगितले आहे. सध्या तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील तपास करण्यात येत आहेत. बरं, आता ती कोण होती आणि कोणत्या शोमध्ये वैशाली दिसली, तिची एंगेजमेंट आणि लग्नाविषयी जाणून घेऊया…

हेही वाचा : ‘तू किती वेळा शारीरिक संबंध…’ #MeToo प्रकरणानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने साजिद खानवर केले गंभीर आरोप

वैशाली ठक्करचा जन्म 15 जुलै 1993 रोजी झाला. ती 29 वर्षांची होती. तिने स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून पदार्पण केले. यामध्ये तिने 2015 ते 2016 पर्यंत संजनाची भूमिका साकारली होती. याशिवाय ती ‘ये है आशिकी’मध्ये वृंदाच्या भूमिकेत दिसली होती.

वैशाली कलर्स टीव्हीच्या लोकप्रिय टीव्ही शो ‘ससुराल सिमर का’ मध्ये 2016 आणि 2017 मध्ये अंजली भारद्वाजच्या भूमिकेत दिसली होती. यामध्ये ती सिद्धार्थ शिवपुरी आणि रोहन मेहरा सोबत होती. याशिवाय ती 2018 मध्ये सब टीव्हीच्या ‘सुपर सिस्टर्स’ या मालिकेतही दिसली होती.

वैशालीनं 2018-2019 मध्ये ‘विश या अमृत: सितारा’ मध्ये नेत्रा सिंग राठोरची भूमिका साकारली होती. 2019-2020 मध्ये, ती ‘मनमोहिनी 2’ मध्ये अनन्या मिश्राच्या भूमिकेत पडद्यावर दिसली. याशिवाय ती दंगलची टीव्ही सीरियल ‘रक्षा बंधन’ मध्ये निशांत मलकानीसोबत दिसली होती.

वैशालीच्या वडिलांचे नाव एचबी ठक्कर, आईचे नाव अन्नू ठक्कर आणि भाऊ नीरज ठक्कर आहे. 28 एप्रिल 2021 रोजी वैशालीनं तिचा साखरपूडा झाल्याची माहिती दिली होती. रोका सोहळ्याचा व्हिडिओही तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. त्याचवेळी पतीचे नाव डॉ अभिनंदन सिंग असल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यांच्या साखरपूड्याला फंक्शनला फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

डॉ अभिनंदनबद्दल बोलायचे झाले तर ते मूळचे केनियाचे आहेत आणि डेन्टल सर्जन आहेत. वैशालीनं साखरपूड्याच्या एका महिन्यानंतरच सर्वांना सांगितले होते की ती डॉ. अभिनंदनशी लग्न करणार नाही. तिनं हे नाते तोडले आहे. जून 2021 मध्ये सर्व काही संपलं. एवढंच नाही तर तिनं रोका सोहळ्याचा व्हिडिओही सोशल मीडियावरून काढून टाकला होता. 

हेही वाचा : प्रेग्नंट आलियाला सोडून रणबीर कोणासोबत करतोय रोमान्स, Video Viral

2021 मध्ये ‘ETimes’ शी झालेल्या संभाषणात, वैशालीनं लग्न मोडण्यामागचे कारण सांगितले की, भारतातील कोविड-19 परिस्थितीमुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्न पुढे ढकलले. लोक जीव गमावत असताना अशा वातावरणात उत्सव साजरा करायला नको.  मला या वर्षी नवीन आयुष्य सुरू करावेसे वाटत नाही. मी लग्न रद्द केले आहे. या वर्षी माझे लग्न नाही. पुढच्या वर्षी सर्व काही ठीक होईल, तरच माझे लग्न होईल.

वैशाली ‘स्पॉटबॉय’ला अभिनंदनबद्दल सांगताना म्हणाली, ‘मी ज्याच्याशी लग्न करत आहे तो डॉ. अभिनंदन सिंग हुंदल आहे आणि तो केनियामध्ये राहतो. तो डेंटल सर्जन आहेत. काही वर्षांपूर्वी त्यानं ‘मिस्टर युगांडा’चा किताबही पटकावला होता. विशेष म्हणजे आम्ही मॅट्रिमोनिअल साइटवर भेटलो होतो.

वैशाली ठक्कर आत्महत्येच्या 5-6 दिवस आधीही इन्स्टाग्रामवर सक्रिय होती. तिनं अनेक फनी रील्स शेअर केले होते. यासोबत तिचा सेल्फी इन्स्टा हँडलवर अपलोड करत असे. इन्स्टाग्रामवर तिचे 585K फॉलोअर्स होते. तिच्या जाण्यानं प्रत्येकजण दु:खी आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *