Headlines

लग्नानंतर रोमान्स संपतो! हे काय बोलल्या जया बच्चन? लोकांनी ऐश्वर्या अभिषेकशी जोडला संबंध

[ad_1]

Jaya Bachchan : बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंब बच्चन यांच्याबद्दल सतत कुठल्या ना कुठल्या बातम्या येत असतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नात्याबदल असो किंवा अभिषेक ऐश्वर्या राय यांच्यामधील तणाव असो. या कुटुंबातील प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कारणावरुन कायम चर्चेत असतात. जया बच्चन या पापाराझींवर कायम चिडलेल्या दिसत असतात. जया बच्चन यांचे पापाराझींवर संतापताना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता जया बच्चन त्यांच्या एका धक्कादायक विधानमुळे चर्चेत आल्या आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर त्यांनी रोमान्सचा विषय काढून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (Romance ends after marriage What did Jaya Bachchan say People connected with Aishwarya Abhishek what the hell navya 2 trailer video)

‘लग्नानंतर रोमान्स संपतो!’ 

जया बच्चन असं काय म्हणाल्यात? त्यांचा इशारा हा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांच्याकडे तर नाही, असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. अमिताभ आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा वॉडकास्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा ‘व्हॉट द हेल नव्या’ दुसऱ्या सिझनमध्ये दिसणार आहे. 

याच शोच्या सिक्रेट्स सेगमेंटमध्ये जया बच्चन यांनी लग्न आणि रोमान्स यावर भाष्य केलं आहे. या शोचा व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होतो आहे. या शोदरम्यान जया इंग हा शब्द ऐकायला मिळतो आणि त्यानंतर जया बच्चन हसायला लागतात. नव्याने पुढे या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणाली की, शिक्षिकेसारखं वागण्याला किंवा सतत दुसऱ्यांना सूचना देण्याला जयाइंग म्हणतात. 

ज्यावेळी जया बच्चन म्हणाल्यात की, लग्नानंतर रोमान्स उरतच नाही, तेव्हा मुलगी श्वेताही म्हणाला की, पण माझ्या घरात काय चाललंय ते सगळं मला माहिती असतं. पुढे नव्याने असाही दावा केला आहे की, आईकडून तिला विनोदबुद्धी वारसात मिळाली आहे. पण त्यावर आई श्वेता लगेचच म्हणते नाही, तुला माझी विनोदबुद्धी अजिबात माहिती नाही. 

जया बच्चन, श्वेता आणि नव्या यांच्यामधील हा संवाद आणि जया बच्चन यांचं ते विधान नक्की कोणासाठी आणि का होतं याचा खुलासा हा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या शोमध्ये समजणार आहे. हा ट्रेलर आऊट झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या कंमेट्स येत आहेत. खास करुन रोमान्सचा संबंध नेटकऱ्यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याशी जोडला आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये काही ठिक नसल्याच्या चर्चा सुरु आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *