Headlines

वट सावित्री व्रतामागची कथा : का करायची वटवृक्षाची पूजा, वाचा संपूर्ण पौराणिक कथा

[ad_1]

Vat Savitri Vrat 2022 Puja : हिंदू धर्मातील महिला कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत केलं जातं. हा सण ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला येतो.

यंदा 30 मे रोजी वट सावित्रीचा मुहूर्त आहे. या दिवशी महिला उपवास करून वटवृक्षाची पूजा करतात. पण तुम्हाला माहीत आहे का वट सावित्री व्रतामध्ये महिला फक्त वटवृक्षाची पूजा का करतात? चला जाणून घेऊया वट सावित्री व्रताचे पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व 

वटवृक्षाची पूजा का केली जाते?
धार्मिक श्रद्धेनुसार, सावित्रीचा पती सत्यवान यांचे अगदी लहान वयात निधन झाले. त्यानंतर सावित्रीने वटवृक्षाखाली यमराजाला प्रसन्न करून आपल्या मृत पतीला जिवंत केले अशी कथा सांगितली जाते. यामुळेच सावित्री व्रताच्या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करतात. वट सावित्री व्रतात सावित्री देवीची पूजा केली जाते.

वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच मुळात ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांचा निवास असल्याचे मानलं जातं. वटवृक्षात या तिन्ही देवतांचा निवास असल्यामुळे याला देववृक्ष म्हणतात. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जाते. 

वट सावित्री व्रत कथा

अश्वपती नावाच्या राजाला मूलबाळ नव्हते. त्यामुळे राजाने यज्ञ केला, त्यानंतर त्याच्या घरी मुलगी झाली. ज्याचे नाव त्यांनी सावित्री ठेवले. सावित्रीचा विवाह घुमटसेन नावाच्या राजाचा मुलगा सत्यवान याच्याशी राजाने केला होता. 

घुमटसेनचे संपूर्ण राज्य हिसकावून घेतले. त्यानंतर सावित्री सासू आणि पतीसोबत जंगलात एका वटवृक्षाखाली राहू लागली. दरम्यान, सासूची दृष्टी गेली. सत्यवान एके दिवशी जंगलात लाकूड तोडत होता. त्यांना डोकेदुखीचा त्रास झाला आणि ते जमिनीवर पडून राहिले.

सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीत घेतले आणि दाबू लागली. इतक्यात यमराज आले आणि म्हणाले की आपली वेळ संपली आहे. मी त्यांना घेऊन जात आहे. सावित्रीही यमराजाच्या मागे लागली. 

सावित्रीची जिद्द पाहून यमराजांनी वरदान मागितले. सावित्रीने सासूबाईंच्या डोळ्यातील प्रकाश मागितला. यानंतरही सावित्री यमराजाच्या मागे लागली. यमराजाने सावित्रीला दुसरे वरदान मागायला सांगितले, सावित्रीने सासरचे राज्य घेतले.

यानंतरही सावित्रीने यमराजाचा हार न मानता यमराजाचा पिच्छा पुरवला केला. सावित्रीची निष्ठा पाहून यमराज अतिशय प्रसन्न झाले आणि तिला शेवटचे वरदान मागायला सांगितले. 

ज्यामध्ये सावित्रीने पतीचे आयुष्य परत मागायला सांगितले. यमराजाने पती सत्यवानाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त केले. त्यानंतर सावित्री परत आली आणि वटवृक्षाजवळ गेली. जिथे तिचा नवरा मृतावस्थेत पडला होता. सावित्री येताच त्याच्या अंगात जीव आला आणि तो उठून बसला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *