Headlines

तीन वर्षे काम नाही… वडिलांच्या उपचारासाठी ‘या’ अभिनेत्यावर घरातच्या महागड्या वस्तू विकण्याची वेळ

[ad_1]

Shoaib Ibrahim  : छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम त्याच्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमुळे चर्चेत आला होता. या मालिके दरम्यानच शोएब आणि त्याची पत्नी दीपिका कक्कडची ओळख झाली होती. इतकंच काय तर इथेच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होते. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. शोएब आणि दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. ते दोघेही बऱ्याच दिवसापासून छोट्या पडद्यापासून लांब आहेत. तरी देखील आज शोएब आणि दीपिकाकडे सगळं आहे. पण तुम्हाला माहितीये का? शोएबवर एक अशी वेळ आली होती जेव्हा त्याच्याकडे वडिलांवर उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. याविषयी शोएबनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 

शोएबनं ही मुलाखत नुकतीच ईटाइम्सला दिली होती. या मुलाखतीत शोएब ससुराल सिमर का ही मालिका सोडण्याविषयी बोलला आहे. शोएब म्हणाला, ‘ती मालिका सोडताना मी खूप घाबरलो होता. कारण ती मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय होती. ती मालिका सोडल्यानंतर मला जवळपास तीन वर्षे काम मिळालं नाही. पण मला असं वाटतं की जर आपल्याला आपल्या आयुष्यात काही करायचं असेल तर थोडी रिस्क घेणं महत्त्वाचं असतं. मला त्यावेळी याची जाणीव होती की माझ्यासाठी हा काळ खूप कठीण असणार आहे. कारण त्याकाळात मला माझ्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्यायचे होते. मी सगळ्यात मोठा होतो म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या देखील जास्त होत्या. इतकंच काय तर त्या पूर्ण देखील करायच्या होत्या. मला माझ्या कुटुंबासाठी सगळं काही करायचं होतं.’

त्याच्या या कठीण काळाविषयी बोलताना शोएब म्हणाला, ती मालिका सोडल्यानंतर त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. दीपिका त्यावेळी त्याची खूप चांगली मैत्रिण होती आणि ती त्याला पाठिंबा देत होते. त्या तीन वर्षात शोएबला खरं जग कळालं. त्या काळात त्यानं स्वत: वर काम केलं.

शोएब ‘पलकों की छांव’ या मालिकेत सुद्धा दिसला होता. त्यासाठी भोपालला त्याचं सिलेक्शन झालं होतं. पण शोबंद झाल्यानंतर तीन महिन्याच्या आता त्याला ससुराल सिमर का ही मालिका मिळाली. त्याकाळात त्याला अनेक चांगले आणि वाईट लोकं भेटली. तीन वर्षे तर त्याच्यासाठी खूप कठीण होते. त्या काळात त्याच्या वडिलांची तब्येत गंभीर झाली होती. जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मी कार घेतली होती. पण वडिलांच्या उपचारासाठी मला ती विकावी लागली. एका व्यक्तीनं माझी फसवणूक केली होती. त्यावेळी एका व्यक्तीनं माझ्याकडून पैसे घेतले आणि अनेक गोष्टी होऊ लागल्या होत्या.

हेही वाचा : वजन इतकं वाढलं की श्वासही घेता येईना… ; देखण्या अभिनेत्यावर आलेली वेळ डोळ्यात पाणी आणेल

दरम्यान, शोएब सध्या ‘अजूनी’ या मालिकेत राजवीरच्या भूमिकेत आहे. याविषयी बोलताना शोएब म्हणाला, ‘जेव्हा पासून त्याची मालिका प्रदर्शित झाली होती. तेव्हा पासून प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिलं आणि राजवीर म्हणून लोक त्याला ओळखू लागले होते. अजूनीनं मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्याची संधी दिली आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ही भूमिका देखील आवडेल.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *