Headlines

Surya Gochar 2022: सूर्य गोचरमुळे दिवाळीपूर्वी या 5 राशींसाठी आहे वाईट काळ, लगेच करा हे उपाय!

[ad_1]

मुंबई : ग्रहांचा राजा म्हटला जाणारा सूर्य देव 17 ऑक्टोबरला स्वतःची राशी बदलणार आहे. या दिवशी ते कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करतील. या संक्रमण काळात अनेक राशींना खूप फायदा होणार आहे. यावेळी 5 राशी आहेत, ज्यांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. त्यांच्याकडून सुरू असलेलं कामही बिघडेल आणि घरात कलह निर्माण होईल. चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत आणि त्यासाठी कोणते उपाय करावे लागतील.

कौटुंबिक जीवनात संघर्ष

कुंभ 

सूर्य ग्रहाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात वादांना सामोरं जावं लागेल. घरामध्ये कलह वाढेल, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल. कामाच्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होईल, जी तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कोणतंही नवीन काम आणि प्रवास सुरू करू नका. आराम मिळवण्यासाठी सूर्य ग्रहाशी संबंधित मंत्रांचा 108 वेळा जप करा.

कर्क 

या राशीच्या लोकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमचे बोलणं कठोर असेल, ज्यामुळे तुमचा इतरांशी वाद होऊ शकतो. जी कामं तुम्हाला मिळतील, ती तुम्ही वेळेत पूर्ण करू शकणार नाही. दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. जर तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्या.

व्यवसायात अडचणी येतील

मेष

व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी वेळ योग्य नाही. व्यवसायात कोणताही नवीन करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे नीट वाचा. आपल्या प्रतिमेची काळजी घ्या आणि कोणाशीही संभाषणात कटू शब्द वापरू नका. विवाहित लोकांच्या जीवनात जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा. 

कन्या 

या राशीच्या लोकांना उत्पन्नाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यांचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असेल. कोणतेही काम वेळेवर पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. जिथे काम कराल तिथे सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. वाटेत चालताना अपघात होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्या देखील असू शकतात. उपायासाठी रोज आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा.

मिथुन

सूर्य गोचर 2022 तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक उलथापालथ घडवून आणेल. कष्ट करूनही तुमच्या इच्छेनुसार फळ मिळणार नाही, त्यामुळे तुमचा राग वाढेल. हा राग तुमच्या स्वतःच्या कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात बाहेर येईल. असं केल्याने तुमच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. या वाईट काळापासून सुटका मिळवण्यासाठी रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्यदेवाला द्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *