![](https://www.absnewsmarathi.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211022-WA0002-1024x461.jpg)
बार्शी / प्रतिनिधी- जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय व त्यामधील जनशक्ती मजदूर सभा, मातंग पॅथर सेना, अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती,दलित पॅंथर बार्शी,माथाडी संघटना, महिला आघाडी सेना कडून सरकारी कामगार अधिकारी यांच्या बार्शी कामगार ऑफिस ला घेराव घातला होता.
स्मार्ट कार्ड द्यावे आणि कामगारांच्या योजना कामगारांना द्याव्या यासाठी आंदोलन केले गेले. त्या आंदोलनाला यश आले असून कामगार आयुक्त निखिल वाळके आणि सरकारी कामगार अधिकारी अशोक कांबळे यांनी आंदोलन ला मान देऊन बार्शी मध्ये स्मार्टकार्ड देण्यास चालू केलेले आहे.
मागिल दोन दिवसापासून पासून कामगारांसाठी मध्यान योजना म्हणजे मोफत जेवण दिले जात आहे. कामगारांचे आरोग्य व्यवस्थित राहावे शरीर बळकट राहावे म्हणून ही योजना अत्यंत चांगली आहे.
जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय मधील पुणे, सोलापूर आणि मुंबई मधील संघटनांनी यामध्ये निवेदन देणे,तक्रारी करणे आणि चर्चा करणे यासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे.त्यामुळेच आम्हाला बार्शी मध्ये मध्ये मध्यान योजना आणि कामगारांची पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे. जास्तीत जास्त कामगारांनी यामध्ये हे लाभ घ्यावा असे आवाहन जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि त्यामध्ये असलेल्या सर्व संघटनांकडून करण्यात आले आहे.
कामगार आयुक्त निखिल वाळखे व सह आयुक्त मा. अशोक कांबळे यांनी सर्व संघटनांना मान देउन स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. कामगारांना दोन वेळेस चे मध्यंन भोजन योजना चालू केले आहे. महिला घरकाम कामगारांच्या नोंदणी चालू झाली आहे. त्याबद्दल मी निलेश मुद्दे व सुरेश चकोर जनआंदोलन समन्वयंक सदस्य सर्व बार्शी तालुक्याच्या कामगारांच्या मार्फत आभार मानतो.तसेच सर्व कामगारांना आवाहन करतो कि विशेष नोंदणी अभियान चालू झाले आहे तरी सर्व कामगारांनी नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा. अशी माहिती एबीएस न्यूज मराठीशी बोलतांना जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय बार्शी निलेश मुद्दे व सुरेश चकोर यांनी दिली.