Headlines

नागा चैतन्यसोबतच्या खासगी क्षणांवर समंथाचं मोठं वक्तव्य; आम्हाला एका खोलीमध्ये…

[ad_1]

मुंबई : नागा चैतन्यसोबतची मैत्री, त्यानंतरचं प्रेम आणि लग्न. जवळपास चार वर्षांचं वैवाहिक नातं आणि त्यानंतर समंथा- नागानं विभक्त होण्याचा घेतलेला निर्णय. शेवटी शेवटी या नात्यात इतकं काही अनपेक्षित घडत गेलं, की चाहत्यांना यावर विश्वास ठेवणं कठीण. (Samantha Ruth Rrabhu, naga chaitanya)

समंथा आणि नागा चैतन्य वेगळे होऊन आता बरेच महिने झाले. नात्याची समीकरणं या दोघांनीही स्वीकारली आणि आपआपल्या परिनं आयुष्य जगण्याची सुरुवात केली. 

हल्लीच समंथानं Koffee With Karan 7 या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. तिथे तिला निर्माता दिग्दर्शक आणि त्या शोचा सूत्रसंचालक करण जोहर यानं नागा चैतन्यसोबतच्या नात्याविषयीही प्रश्न केले. 

करणनं यावेळी नागा चैतन्यचा उल्लेख समंथाचा पती म्हणून केला. जेव्हा तिनं लगेचच त्याची चूक सुधारत Ex Husband अशी दुरुस्तीही करुन घेतली. त्यावर, आता तुम्हा दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे का? यासंदर्भातील प्रश्न विचारला. 

करणच्या या प्रश्नाचं उत्तर देत समंथानं काही गोष्टी अधिकच स्पष्ट केल्या, ‘तुम्ही जर आम्हाला एका खोलीत ठेवलं, तर धारदार गोष्टी लपवाव्या लागतील…’ असं म्हटल्यानंतर लगेचच समंथानं आता सर्व ठीक आहे, भविष्यातही गोष्टी सुधारतील असंही सूचक वक्तव्य तिनं केलं. 

करणनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये समंथा आणि नागा चैतन्यच्या नात्याबाबतचे बरेच प्रश्न विचारले गेले. यावेळी तिनंही या प्रश्नांची उत्तरं दिली. आपण 250 कोटी रुपयांची पोटगी घेतल्याची अफवा ऐकून विचित्र वाटल्याची भावनाही तिनं यावेळी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *