Headlines

”…त्यांचा गैरफायदा घेणारे लोक” पोलिस खात्यात होते मिलिंद गवळी यांचे वडील; जिद्द वाचून तुम्ही कराल सलाम

[ad_1]

Milind Gawali Post: मिलिंद गवळी हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. 2019 पासून ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तेव्हापासून अनिरूद्धचीच सोशल मीडियावर क्रेझ आहे. खासकरून अनिरूद्ध हा मीम्समध्येही दिसतो आणि त्याची नेटकऱ्यांमध्येही क्रेझ असलेली पाहायला मिळते आहे. त्यांच्या अनिरूद्ध या पात्रानं त्यांचे सर्वत्र कौतुक झाले आहे. त्यातून या पात्रासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत. सोबतचे ते इन्टाग्रामवरही चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या पोस्टही अनेकदा व्हायरल होताना दिसतात आणि तेही मोठमोठी वाचनीय पोस्ट शेअर करताना दिसतात. सध्या त्यांच्या अशाच एका पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. यात त्यांनी आनंद या विषयावर चांगले भाष्य केले आहे. सोबतच त्यांनी आपल्या आईवडिलांचीही आठवण यात सांगितली आहे तेव्हा जाणून घेऊया की नक्की त्यांनी या पोस्टमध्ये काय लिहिलं आहे. 

मिलिंद गवळी यांनी आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आनंद” प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात, काही ना खाण्यापिण्यामध्ये खूप आनंद मिळतो. माझा एक मित्र आहे, खास एखाद्या हॉटेलमध्ये एखादी डिश अतिशय चांगली मिळते म्हणून खूप लांबचा प्रवास करून तिथे जाऊन तो पदार्थ खातो. काही जण असे असतात की खाण्यापेक्षा त्यांच्या खाण्यावरच्या चर्चा करायला खूप आवडतं, काहींना तर झोपण्यामध्ये आनंद मिळतो. अगदी अभिमानाने सांगतात की “आज साडेबारा-एक वाजता उठलो आणि मग नाश्ता केला”, काहीना मोबाईल गेम्स खेळण्यात, वाचन लिखाण सिनेमा पाहायला, काही ना प्रवास करण्यामध्ये आनंद मिळतो, काही जणांना गाण्यांमध्ये आनंद मिळतो. काहीं ना निसर्गाच्या सानिध्यात आनंद, माझं असं लक्षात आलं आहे की आनंद हा आपल्याच मानण्यामध्ये असतो, माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मला काही छान आनंदी माणसं भेटली होती, जी काही कारण नसलं तरी आनंदी असायची, सदैव प्रसन्न असायची, दोन पैसे कमी असतील त्यांच्याकडे पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कमी व्हायचं नाही, त्यांना भेटलं की आपोआपच आपल्याही चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायचं.”

वडिलांची आठवण 

”माझ्या वडिलांना दुसऱ्यांना मदत करण्यात फार आनंद मिळतो, दुसऱ्याला आपली गरज आहे आणि त्यांना मदत करण्यात आनंद मिळतो आणि ते प्रसन्न होतात. ते पोलीस खात्यात होते त्यावेळेला त्यांचा गैरफायदा घेणारे असंख्य लोक होते, आम्हाला ते जाणवायचं की हा माणूस त्यांचा गैरफायदा घेतो आहे, पण त्याचं त्यांना कधीच काही वाटलं नाही, आपल्याकडे मदत मागायला आला आहे आणि आपण त्याला प्रामाणिकपणे मदत करावी एवढेच त्यांना माहीत होतं. त्यामुळे ते सतत प्रसन्न आणि आनंदी राहतात , कारण मनामध्ये काही कपटच नसतं .प्रामाणिकपणे काम करत राहणे यात जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही असं त्यांना वाटतं.”

आई वडिलांचे गुण माझ्यात

”मी कसा जरी असलो तरी माझ्या आई-वडिलांचे काही अतिशय चांगले गुण माझ्यामध्ये थोडीफार उतरलेले आहेत, कदाचित त्यामुळेच इतकी वर्ष मी या क्षेत्रामध्ये मी तरलोय. आनंदी प्रसन्न माणसं सगळ्यांनाच आवडतात असतात, पण रागवणाऱ्या माणसांपासून लोक थांब पळत असतात, रागावणं चिडणं किंवा शिवीगाळ करणं याने मला असं वाटतं त्याने आपल्याच शरीरामध्ये बिघाड होतो, त्यांचं स्वतःचं शरीराचे इंजिन तापल्यामुळे लवकर बंद पडायची शक्यता असते, याउलट आनंदी माणूस खूप निरोगी आणि energetic आयुष्य जगतो. मला फोटो काढायला आणि काढून घेण्यात आनंद मिळतो. “आई कुठे काय करते” सेट वर photographer प्राजक्ता भावसार ने हा फोटो काढला आहे. खूप खूप धन्यवाद प्राजक्ता” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.” 

या पोस्टखाली नानाविध कमेंट्सही आल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या पोस्टला प्रतिक्रिया दिल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *