Headlines

कपूर कुटुंबात गेलेल्या आलियासोबत हे काय घडलं की आठवलं माहेर?

[ad_1]

मुंबई : पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं त्यांच्या नात्याचा योग्य तो वेळ दिल्यानंतर हे पाऊल उचललं. काही दिवसांपूर्वीच तिनं आपण गरोदर असल्याचीही गोड बातमी दिली. (Bollywood Actress Alia Bhatt reveales feeling of being kapoors daughter in law)

बाळाच्या आगमनासाठी आतुर असणाऱ्या आलियाला सासरी गेल्यानंतरचा काळ फारसा सोपा नव्हता. पण, तरीही तिनं त्यातही स्वत:ला मिसळून घेतलं. कपूर कुटुंबात असं काही घडत असेल याची तिलाही फारशी कल्पना नसावी. ज्यामुळं एका क्षणाला तिला माहेरही आठवलं. 

निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या Koffee With Karan Season 7 या टॉक शोमध्ये आलियानं याबाबतचं वक्तव्य केलं. करणशी आपल्या सासरच्या कुटुंबाबद्दल बोलताना आलियानं कुटुंबाच्या खासगी क्षणांचा उलगडा केला. 

काय म्हणाली आलिया? 
‘आई, वडील आणि बहीण अशा कुटुंबात मी मोठी झाली आहे. इतकंच काय ते. आमच्यामध्ये फार कमी बोलणं व्हायचं. आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो. पण, आमचं कुटुंब मोठं नव्हतं. आमच्याकडे कधीच इतके उत्सव, गेटटुगेदर वगैरे नसायचे. जो तो आपआपलं काम करत असायचा’

माहेरच्या घरातील आठवणी सांगितल्यानंतर तिनं मोर्चा सासरच्या कुटुंबाकडे वळवला. कपूर कुटुंबात प्रवेश केल्यानंतर तिथे तुम्ही एकत्र जेवता, एकत्र आरती करता बऱ्याच गोष्टी एकत्र होतात, असं सांगत ही बाब किती सुंदर आहे असं ती म्हणाली. 

कपूर कुटुंबाकडून आपल्याला आयुष्यातला एक नवा आणि तितकाच हवाहवासा अध्याय दिला, असं सांगत तिनं कुटुंबाचं कौतुक केलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *