Headlines

कंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर

[ad_1]

Kangana Ranaut Vs Neetu Kapoor: आपल्या परिवारावर जर का कोणी नाही नाही तर आरोप केले तर ते कोणीही सहन करत नाही. कधी कधी शांत बसणं हा त्यावर उपाय असतो अथवा काहीही गाजावाजा न करता त्यावर योग्य उत्तर देणे हेही अगदी सुबुद्धीपणाचे लक्षण असते. काही दिवसांपुर्वी कंगना राणौत या अभिनेत्रीनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीकाटिप्पणी केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगली होती. आता आपल्या या वादग्रस्त विधानानं कपूर कुटुंबियांमध्ये खरंच वादळ आलं आहे का यावर त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कंगना कायमच अनेकांवर टीका करत असतेच, त्यामुळे तिची ही टीका काही नवीन नाही त्यात किती विश्वास ठेवावा असा जर का कोणाचा मतप्रवाह असेल तर आता नीतू कपूरच्या पोस्टनं मात्र तुम्हालाही घाम येऊ शकतो. 

यावेळी ज्याप्रमाणे कंगनानं आलिया आणि रणबीरचं नावं न घेता टीका केली होती. त्याचप्रमाणे कोणाचेही नावं न घेता नीतू कपूर यांनी आपल्या इन्टाग्राम पेजवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यावरून चाहत्यांमध्ये नानाविध तर्क काढणं सुरू झालं आहे. त्यांनी Family वर भाष्य करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा एक प्रकारे Quote आहे. त्यामुळे हे कंगनाला एकप्रकारे प्रत्यूत्तर आहे का? का कंगना म्हणते तेच खरं आहे. अशाप्रकारे नानाविध तर्क काढायला सुरूवात झाली आहे. तेव्हा नक्की ही पोस्ट काय आहे याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या लेखातून जाणून घेऊया की नक्की हा प्रकार आहे तरी काय? 

हेही वाचा – Naseeruddin Shah birthday: अभिनयात दर्जेदार पण नसिरूद्दीन शहा यांची ‘ही’ वादग्रस्त वक्तव्य कोण विसरेल?

काय आहे नीतू कपूर यांच्या पोस्टमध्ये? 

”आमचा परिवार हा आता पुर्वीसारखा राहिलेला नाही यामागे कारण आहे की जे आम्हाला एकत्र ठेवतात आम्ही त्यांना गाडून टाकतो”, त्यांनी इंग्रजीमध्ये का कोट पोस्ट केला आहे त्यामुळे चाहते हे पुरते संभ्रमात आले आहे. त्यांनी इन्टाग्रामवरून ही स्टोरी शेअर केली आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

कंगनानं काय पोस्ट केली होती? 

तिनं इन्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं होतं की, ”हे तेव्हा होतं जेव्हा तुम्ही प्रमोशनसाठी लग्न करून बसता. या अभिनेत्रीनं मूवी माफियाच्या दबावाखाली येऊन लग्न केले. पापाच्या या परीला लग्नाच्या बदल्यात तिला एक चित्रपट मिळेल. आता ती या फेक मॅरेजपासून सुटका घ्यायच्या तयारीत आहे. आता आपल्या लेकीचा आणि पत्नीचा या अभिनेत्याला सांभाळ करायचा आहे. हा भारत आहे येथे एकदा लग्न झाले की झाले.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *