Headlines

भारत-पाकिस्तान सामन्याआधी आफ्रिदीचे मोठे वक्तव्य, म्हणाला धोनीने पाकिस्तानी संघाला…

[ad_1]

मुंबई : भारत – पाकिस्तान (India vs pakistan) संघ लवकरच आमने-सामने येणारेत. टी-२० विश्वचषकात (T20 World cup) दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची आतापासून चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid afridi) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत (MS Dhoni) महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानला काहीही समजत नव्हता, असे त्याने म्हटले आहे.

आफ्रिदीने समा टीव्हीशी बोलताना म्हटले की, धोनी कर्णधार असताना भारताचा पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. भारताने पाकिस्तानला बाजूला सारून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेशी स्पर्धा सुरू केली होती. मात्र, अलीकडच्या काळात पाकिस्तानने खेळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्याचे आफ्रिदीला वाटते.

काय म्हणाला आफ्रिदी?

आफ्रिदी म्हणाला, जर तुम्ही भारतीय संघाकडे बघितले तर, गेल्या काही वर्षांत, विशेषतः धोनीच्या काळात, त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांनी पाकिस्तानला उद्ध्वस्त केले. पाकिस्तान-भारत सामने ते ते जिंकत राहिले. भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेशी स्पर्धा सुरू केली.

आफ्रिदी पुढे म्हणाला की, ‘त्यांनी (भारत) पाकिस्तानला बाजूला ठेवले होते. मात्र, आता त्या गोष्टी परत येत आहेत आणि नक्कीच परत येतील. वृत्ती खूप महत्वाची आहे. तुम्ही स्वतःला कोणत्या स्तरावर ठेवू इच्छिता हे ते ठरवते.

भारताचा एकदा पराभव

गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानकडून (Pakistan Team) एकही सामना गमावला नव्हता. वनडे विश्वचषक (world cup) स्पर्धेत सात वेळा आणि टी-20मध्ये पाच वेळा पाकिस्तानचा पराभव केला होता. गेल्या वर्षी तो तुटला. दुबईत झालेल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. त्यानंतर यावर्षी आशिया चषक स्पर्धेत भारताने दोनपैकी एका सामन्यात त्याचा पराभव केला. त्याचवेळी एका सामन्यात पराभव पत्करावा लागला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *