Headlines

एकाच हिरोच्या प्रेमात असलेल्या ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्रींचं सेटवरच जोरदार भांडण; त्याने मात्र तिसरीशीच…

[ad_1]

मुंबई : प्रेमात आणि युद्धामध्ये सर्व काही न्याय्य आहे. प्रेम जर लोकांच्या हृदयाची शांती हिरावून घेतं, तर ते बुद्धीवरही पडदा टाकतं. जणू विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्तीच हरवली आहे. ९० च्या दशकातील दोन अभिनेत्रींच्या कृती हेच सांगतात. त्या काळात अनेक अभिनेत्री आल्या, पण रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांची नावं खूप हायलाईट व्हायची. एकापेक्षा एक चित्रपट, स्टारकास्टही मोठी असायची. पण असं म्हटलं जातं की, दोन्ही अभिनेत्रींचं हृदय एकाच अभिनेत्यासाठी धडधडत होतं आणि मग जे घडलं ते बातम्यांची हेडलाइन बनलं.

अजय देवगण आणि रवीना टंडन प्रेमात पडले
अजय देवगणच्या पदार्पणानंतर रवीना टंडननेही हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. ही जोडी जेव्हा चित्रपटांमध्ये एकत्र दिसली तेव्हा लोकांना ती खूप आवडली. पडद्यावरचं प्रेम कधी खऱ्या आयुष्यात सुरु झालं. हे कोणालाच कळलं नाही. त्यानंतर लगेचच त्यांच्या अफेअरची चर्चा फिल्म मॅगझिनमध्ये रंगू लागली. यानंतर करिश्मा कपूरची जोडी अजय देवगणसोबत जिगर या चित्रपटात दिसली.

लोकांना ही जोडी खूप आवडली पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर लवकरच करिश्मा आणि अजयच्याही प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या. दोघांमध्ये काही खिचडी शिजत असल्याच्या बातम्या सतत मॅग्झिनमध्ये येऊ लागल्या. असं म्हटलं जातं की, त्यावेळी दोघंही सेटवर तासंतास बोलत रहायचे, याचबरोबर शूटिंग संपल्यानंतरही फोनवर त्यांचं संभाषण सुरु असायच. हळूहळू या बातम्या रवीनाच्याही कानावर गेल्या.

दोन अभिनेत्रींमध्ये जोरात भांडण सुरू झालं
असं म्हटलं जातं की, त्यावेळी या दोन अभिनेत्रींमध्ये अजय देवगणवरुन जोरदार भांडण झालं.  ज्याचे अनेक लोक साक्षीदार झाले होते. ज्यावेळी या सर्व बातम्या येत होत्या, त्यावेळी करिश्मा आणि रवीना एकाच चित्रपटात एकत्र काम करत होत्या. त्यांना एकत्र गाणं शूट करायचं होतं. मात्र दोघीही एकमेकांशी बोलत नव्हत्या. पण त्यानंतर गाण्याच्या शूटिंगदरम्यान करिश्मा आणि रवीना एकमेकांशी भिडल्या आणि दोघांनी एकमेकींचे केस ओडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे संपूर्ण भांडण क्रूसमोर झालं.

मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिनेत्री रवीना आणि करिश्मा ज्याला मिळवण्यासाठी एकमेकांना भिडल्या, तो मात्र दुसरीच्याच प्रेमात होता. काजोलसोबत अनेक चित्रपट केल्यानंतर त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलली ते त्यांनाच कळलं नाही. 1999 मध्ये, काजोलने केवळ कुटुंबातील सदस्यांमध्ये अजय देवगणशी गुपचूप लग्न केलं



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *