Headlines

‘धर्मवीर 2’ सिनेमात उलगडणार अनेक रहस्य; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या (Marathi Movie) पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे (Anand Dighe) कळाले.  कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.  

13 मे रोजी दिघे साहेबांचा जीवनपट पडद्यावर आला आणि पहिल्याचं दिवशी सिनेमाने दणदणीत विक्रम रचला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तुफान मजल मारली. मात्र धर्मवीर सिनेमाच्या (Dharmaveer Movie) प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता.  त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवलं जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

यावर मंगेश देसाई म्हणाले की, ‘धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत”. त्यामुळे धर्मवीरच्या पुढच्या भागात अनेक रहस्य उलगडणार असल्याचं म्हटलं जात आहे. २०२४ मध्ये धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला २७ डिसेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली होती. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकार व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ‘धर्मवीर’च्या पुढील भागाची घोषणा चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे.

‘धर्मवीर’ सिनेमात आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.

प्रसादने साकारलेले आनंद दिघे पाहताना त्यानं या व्यक्तीरेखेसाठी घेतलेली मेहनत लगेचच लक्षात येत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, हिंदूच्या पाठी ठाम उभं राहाणं, महिलांना सुरक्षितता देणं, सामाजिक तंटे सोडवणं, ठाण्याचा विकास करणं अशी अनेक काम दिघेसाहेबांनी केली आहेत. २०२४ मध्ये धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *