Headlines

Amitabh Bachchan यांना आठवलं ब्रेकअपचं दुःख! म्हणाले, ‘त्या दिवसांत मी…’

[ad_1]

मुंबई : सहसा चाहत्यांना सेलिब्रिटींच्या प्रेमकहाणीपोटी कमालीची उत्सुकता आणि कुतूहल असतं. पण, इथे मात्र परिस्थिती जरा वेगळी आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आलेल्या एका स्पर्धकाची प्रेमकहाणी ऐकताना अमिताभ बच्चन हे त्यात बरेच रमलेले दिसले. यासंबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्टही केला गेला आहे. 

अमिताभ बच्चन ज्याप्रकारे कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करतात त्याप्रमाणे चाहत्यांना आनंद मिळतो.  प्रत्येक एपिसोडमध्ये, बिग बी मनमोकळेपणाने त्यांच्या स्पर्धकांशी बोलतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्से देखील सांगतात. काही वेळापूर्वी एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लव्हलाईफबद्दल एक आठवण सांगितली होती. बिग बींनी स्पर्धकांसमोर त्यांच्या ब्रेकअपचे दुःख सांगितलं.  

अमिताभ बच्चन यांना त्यांच्या ब्रेकअपचे दुःख आठवले!
अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर एक स्पर्धक येऊन बसला जो खूपच तरुण होता. यावेळी बोलतना, KBC होस्ट बीग बींनी त्याच्या मैत्रिणीकडे बोट दाखवलं आणि त्याला विचारलं की, त्याची कोणी ‘खास गर्लफ्रेंड’ आहे की नाही. यावर हा तरुण म्हणाला की, माझी एक गर्लफ्रेंड होती, मात्र काही वेळापूर्वी आमचं ब्रेकअप झालं. यानंतर यावर बीग बी म्हणाले, मी तुझी ब्रेकअप स्टोरी ऐकून स्वत:ला ती रिलेट करत आहे.

बीग बी म्हणाले, तरुणपणात मी…
 ‘आता आमचं लग्न झालं पण तरुणपणी माझंही ब्रेकअप झालंय त्यामुळे ब्रेकअपच्या दुख:तून मीही गेलो आहे.’ यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बिग बींच्या या खुलाशाचा संबंध युजर्सने रेखासोबतचं नातं तुटण्याशी अनेकांनी जोडला आहे. जेव्हा तरुणाने कौन बनेगा बीग बींना त्यांच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं तेव्हा तो म्हणाला की, तरुणाला आणखी काही सांगण्याची गरज नाही कारण त्याला समजलं आहे की ब्रेकअपचे दुःख किती वाईट आणि भयंकर आहे.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत आणि गाजलेली लव्हस्टोरी म्हणजे महानायक अमिताभ (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची…या लव्हबर्डबद्दल अनेक पिढ्यांनी ऐकलं आहे. आजही त्यांचा प्रेमकहाणीचे अनेक किस्से ऐकले जातात. आताच्या पिढीलाही अमिताभ आणि रेखाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. 

बीग बी आणि जया बच्चन  3 जून 1973 रोजी लग्नंबधनात अडकले. या दोघांनी अतिशय साधेपद्धतीने लग्न केलं. या लग्नाला अतिशय जवळची मंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते. हा सोहळा अतिशय साधेपणाने पार पडला. अमिताभ आणि जया  ‘जंजीर’ सिनेमात होते. हा सिनेमा हिट होताच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *