Headlines

Amitabh Bachchan: 22 चित्रपटांमध्ये बिग बी यांचं नाव होते ‘विजय’, जाणून घ्या या मागचं कारण

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज जगभरात त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने आणि अनोख्या शैलीसाठी ते जगभर प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह गेल्या अनेक दशकांपासून इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत. 11 ऑक्टोबर रोजी अभिनेता 80 वर्षांचे होणार आहे. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का त्यांनी 22 चित्रपटांमध्ये विजय याच नावाचं पात्र साकारलं आहे.

1969 मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. अभिनेत्याचा पहिलाच चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. यानंतर अमिताभ अनेक चित्रपटांमध्ये दिसले, पण यशाने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आणि अशा परिस्थितीत त्यांनी सलग 12 फ्लॉप चित्रपट दिले. इतके फ्लॉप दिल्यानंतर ते खूप निराश झाले होते. पण नंतर त्यांना प्रकाश मेहरा यांच्या जंजीर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ज्याने त्यांचे नशीब पुन्हा उजळले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

प्रकाश मेहरा यांच्या जंजीर (Janjir) या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन (Angree young man) म्हणून ओळख मिळाली. हा चित्रपट यापूर्वी अनेक सुपरस्टार्सना ऑफर करण्यात आला होता, परंतु रोमँटिक हिरोची प्रतिमा वगळता कोणालाही पडद्यावर अँग्री यंग मॅन व्हायचे नव्हते. नंतर हा चित्रपट अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांना ऑफर करण्यात आला आणि त्यांनी इन्स्पेक्टर विजय खन्ना यांची भूमिका केली. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर 22 चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांना विजय हेच नाव देण्यात आले. पण आता तुम्ही विचार करत असाल की या नावात इतकं काय खास आहे, तर मग आम्ही तुम्हाला याचं कारण सांगणार आहोत.

बॉलिवूडमधील शहेनशाहवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. अशा परिस्थितीत सुप्रसिद्ध लेखिका भावना सोमय्या एकदा म्हणाल्या की, आपल्या उद्योगात एक प्रथा आहे. ज्या नावाने एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट सुपरहिट ठरतो, त्यानंतर बहुतेक चित्रपटांमध्ये त्याचे नाव तेच ठेवले जाते. अशा परिस्थितीत जंजीर सुपरहिट झाल्यानंतर 22 चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांना विजयचे नाव देण्यात आले. त्याचवेळी जावेद अख्तर यांनी या संदर्भात लेखकाला सांगितले होते की, ते (अमिताभ बच्चन) प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवायचे, कदाचित त्यामुळेच त्यांना चित्रपटांमध्ये विजय असे नाव देण्यात आले.

पाहा कोणते आहेत ते 22 सिनेमे

रण      2010
निशब्द      2007
गंगोत्री     2007
गंगा      2006
आंखें     2002
एक रिश्ता:द बांड ऑफ लव     2001
अकेला     1991
अग्निपथ      1990
शहंशाह     1988
आखिरी रास्ता     1986
शक्ति      1982
शान     1980
दो और दो पांच     1980
दोस्ताना      1980
काला पत्थर     1979
द ग्रेट गैम्बलर     1979
त्रिशूल      1978
डॉन     1978
हेरा फेरी      1976
दीवार     1975
रोटी कपड़ा और मकान      1974
जंजीर     1973



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *