Headlines

अभिषेक बच्चन आधीच विवाहित आहे ऐश्वर्या? अमिताभ बच्चन यांना ऐकून बसला होता धक्का

[ad_1]

मुंबई : ऐश्वर्या आणि अभिषेक हे बॉलिवूडचं आदर्श कपल मानलं जातं. हे बॉलिवूडचं लाडक कपल आहे.  2007 मध्ये या दोघानी लग्नगाठ बांधली. या दोघांचं लग्न खूपचं खासगी होतं. या दोघांच्या लग्नाला केवळ त्यांच्या जवळची माणसं उपस्थित होते.  २० एप्रिल रोजी या दोघांनी लग्न केलं. मात्र तुम्हाला माहिती आहे का? ऐश्वर्याचं अभिषेक बच्चनसोबत लग्न होण्याआधीच ती विवाहीत आहे. होय हे खरं आहे की, ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्नगाठ बांधण्याआधीच एक लग्न केलं आहे. 

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाबाबत चित्रपटसृष्टीत अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या. त्यांचं लग्न हे  सगळ्यात जास्त चर्चेत होतं. त्यांच्या लग्नाची सर्वात जास्त चर्चा झाली होती ती म्हणजे तिच्या आधीच्या लग्नाची. कारण ऐश्वर्या रायने अभिषेकच्या आधी एका झाडाशी लग्न केलं होतं.

असं म्हटलं जात की,  ऐश्वर्याला मंगळ दोष होता. त्यामुळे तिचं एका झाडाशी लग्न झालं होतं. 2008 मध्ये, ऐश्वर्या रायने एनडीटीव्हीशी याबद्दल बोलताना तिने याबद्दल खुलासा करत सांगितलं होतं. ”हे खूपच लाजिरवाणं आहे. जेव्हा विदेशी पत्रकार तुमच्यासोबत तुमच्या इंटरनॅशनल टूरबद्दल विचारलं की, लग्नात अशा काही बाबी आहेत का ज्याची तिला अपेक्षा नव्हती? हा प्रश्न विचारला असता ऐश्वर्या म्हणाली, “त्यापैकी काही अपेक्षित होते, परंतु त्यातील काही गोष्टींची आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता.”

ती नक्की कशाबद्दल बोलत आहे, असं विचारलं असता, ऐश्वर्या म्हणाली, “काही घटना घडल्या, पण त्याकडे आपण इतकं लक्ष का द्याव?” यानंतर तिला तिच्या पहिल्या विवाहावरील वादाबद्दल बोलत आहेस का?  असं विचारलं असता, ऐश्वर्या म्हणाली, “हो, त्याबद्दल बरंच काही आहे. मला वाटले की, ते इतके अनावश्यक होतं. प्राईम टाईमचा प्रकार, त्यासाठी कोणत्या प्रकारचे न्यूज कव्हरेज आणि मॅगझिन कव्हर स्टोरीज हे सर्व अनावश्यक होत्या. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एक कुटुंब म्हणून मजबूत आहोत. आम्ही सगळेच लोकांच्या मनात आहोत, आणि आम्हाला स्वतःला ऐकवण्याची पुरेशी संधी आहे, मात्र गोंधळ वाढवण्याऐवजी, आम्हाला ते संपवणे चांगले वाटलं.  त्यामुळे आम्ही तेव्हा एका विशिष्टवेळी मीडियाला भेटलो, आणि त्यांना आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.”

2006 च्या हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालात एका ज्योतिषाचा हवाला देऊन म्हटलं गेलं की, “माझ्या सूचनेनुसार अभिषेक आणि ऐश्वर्या वाराणसीत होते. मी दोन्ही कुटुंबांना प्राचीन शिव मंदिरात ही पूजा करण्याचा सल्ला दिला.” असा कोणताही सोहळा झाल्याचा बच्चन कुटुंबीयांनी वारंवार इन्कार केला आहे. त्यांच्या लग्नाच्या एक वर्ष आधी, हे कपल ‘कुंभ विवाह’ करण्यासाठी वाराणसीला रवाना झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. 

अभिषेकने 2016 मध्ये ट्विट करत सांगितलं होतं की, “आणि फक्त रेकॉर्डसाठी, आम्ही अजूनही या झाडाचा शोध घेत आहोत.” 2007 मध्ये, अमिताभ यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, कुटुंब अंधश्रद्धाळू नाही आणि त्यांनी ऐश्वर्याचा ‘जन्मपत्री’ देखील पाहिला नाही.  ते झाड कुठे आहे? प्लीज मला दाखवा. तिने ज्याच्याशी लग्न केलं आहे तो फक्त आणि फक्त माझा मुलगा आहे.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *