लातूर – अधिकाऱ्यांना बुके न देता वह्या किंवा पेन दया. आशयाचे एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.त्या पत्राचे जनतेमधून कौतुक होत आहे. ही घटना आहे लातूर जिल्हयातील देवणी तालुक्याची.
काय आहे पत्र जाणून घ्या सविस्तर
गटविकास अधिकारी पंचायत समिती देऊनी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक , ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की पंचायत समिती देवणी अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळांना ग्रामपंचायत कार्यालयास जिल्हास्तर , तालुकास्तर अधिकारी यांना भेटीच्या वेळी शाल , श्रीफळ , हार , बुके देऊन सत्कार करू नये. त्याऐवजी एक डझन वह्या किंवा पेन किंवा इतर शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करावा. करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शाळा सुरू होताच गरजू मुलांना आपण दिलेल्या साहित्याचं वाटप करण्यात येईल.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
हे पत्र 28 जुलै 2021 रोजी सर्व मुख्याध्यापक , ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या नावे काढण्यात आले आहे.