Headlines

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ शिष्यवृत्ती जमा करा – SFI

सोलापूर ( 1जून ) – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) राज्य कमिटी आज संपूर्ण महाराष्ट्रात शिष्यवृत्ती या मागणीला घेऊन आंदोलन करण्याचा आवाहन केले होते. याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर जिल्हा कमिटी च्या वतीने शिष्यवृत्ती च्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

            सध्या जगभरासह देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आहे. यामुळे राज्यातील जनतेला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार व आरोग्य व्यवस्था संपूर्ण प्रयत्न करत आहे. या महामारीला आटोक्यात आणण्याचे खूप मोठे आव्हान आपल्या  सर्वांसमोर उभे ठाकले आहे. या महामारीने अनेकांचे बळी घेतले. लाखो कुटुंबांचे हाताचा रोजगार हिरावून गेला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार व समाजातील अशाच प्रकारची कामे करून आपले कुटुंब चालवणाऱ्यांवर आज अधिकच संकट कोसळले आहे. म्हणून या महामारीने हाहाकार माजवला आहे. याने सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. 

           विद्यार्थ्यांवर देखील या महामारीचा वाईट असा परिमाण झालेला आहे. शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी राज्यात, देशात आणि परदेशात अडकून पडले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच करण्यात आलेले आहे. परंतु अजूनही बरेच विद्यार्थी अशाच अडचणीत आहेत. लॉकडाऊनमुळे यंदा थोडे लवकरच शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे साल संपले आहे. आतापर्यंत राज्यातील सर्वच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत देखील राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत शिष्यवृत्ती न मिळणे, ही खूपच निंदाजनक बाब आहे. इतर कर्तव्ये पार पडताना सरकारने शिष्यवृत्ती वितरीत करण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने यावर गंभीर विचार करावा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या शिष्यवृत्तीला वितरीत करण्यास इतका विलंब होणे. हे ढिसाळ नियोजनाचे लक्षण आहे. याचा एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी व सोलापूर जिल्हा कमिटी निषेध करते.

             एसएफआयने शिष्यवृत्तीबाबत मागे १८ एप्रिल व २५ मे असे दोन वेळा ई-मेल द्वारे निवेदन पाठवले होते. आम्ही पुन्हा आपणास मागणी करतो कि, येत्या आठ दिवसापर्यंत राज्यातील सर्व अभ्यासक्रमाच्या व सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करावे. अन्यथा राज्यभरात एसएफआय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडेल. यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असा इशारा यावेळी देत आहोत.

            यावेळी एसएफआय चे राज्य सहसचिव व जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, माजी जिल्हाध्यक्ष किशोर झेंडेकर, माजी सहसचिव गणेश भोईटे, सहसचिव शामसुंदर आडम, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सहसचिव पल्लवी मासन, स.मं.सदस्य राहुल भैसे, जि.क.सदस्य प्रशांत आडम, पूनम गायकवाड, दुर्गादास कनकुंटला, राजेश्वरी पडाल, अश्विनी मामड्याल, अनिल बोगा, प्रियंका कीर्तने, प्रतीक्षा गायकवाड, प्राजक्ता कीर्तने, अयान पेरमपल्ली इ. विद्यार्थी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *