मुंबई – राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी ची नियमावली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड जाहीर करतील.
अशीही माहिती श्री टोपे यांनी दिली. बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. आज किंवा उद्यापासून कडक लॉकडाउन जाहीर होईल. मुख्यमंत्री लवकरच नियमावली जाहीर करतील.अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.