Headlines

बाई!

बाई तुझं दु:ख कुणा कळेना

जिच्यामुळे आपण सृष्टी पाहतो ती बाई असते,

आणि तिचाचं गर्भपात केला जातो, या समाजात

तिला वेदना होतात, पण तिला कोणी बोलू देत नाही

आपण जन्म घेतो बाईच्या पोटी, पुरुषाच्या नाही

हे विसरता कामा नये,

आणि तरी देखील तिच्यावरती अन्याय होतोय

आणि तीच्याचं मुलीला जन्माच्या आधीच मारल जात,

ती देखील बाईचं असते हे कसं काय समजत नाही लोकांना

ज्यावेळेस बालविवाह होतो आणि हुंड्यापाई  मुलीशी लग्न केले जात,

त्यावेळेपासून जाच चालू होतो, तो मरे पर्यंत चालू च राहतो

शेवटी मेल्यानंतर तिची संपत्ती लुटायचे असते ना,

त्यामुळे हुंडा महत्त्वाचा वाटतो

 ज्या-ज्या वेळेस तीच्यावरती बलात्कार होतो,

त्या-त्या वेळेस तीचा आवाज दाबला जातो

बाईचं दु:ख हे कधी मिटणार नाही,

कारण बाई एवढ सहनशील कोनचं नाही

आणि ज्या वेळेस तीचा उद्रेक होईल,

त्या वेळेस सृष्टीचा अंत होईल

बाईची सुरक्षा बाईचं करू शकते, कारण ज्या वेळेस अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळेस तीने प्रहार केला पाहिजे याशिवाय समाजातील वाईट नीतिमत्ता संपणार नाही.

                   

                नाव: रविशंकर लता गुरुनाथ जमदाडे

                  मु.पो.तावशी    ता.पंढरपूर  जि.सोलापूर 

                  मोबाइल नंबर: 9763632750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *