Headlines

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी

३ लाख २० हजार पास वाटप
२ लाख ५८ हजार व्यक्ती  काँरंटाईन
३ कोटी ८७ लाखांचा दंड
-गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.११ –  लाँक डाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,३२,८४३ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच २,५८,७९२ व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
            राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १० मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,०३,३४५ गुन्हे नोंद झाले असून १९,६३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८७ लाख ५० हजार ४९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कडक कारवाई
             कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दलआरोग्य विभागडॉक्टर्सनर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
 या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २०७ घटना घडल्या. त्यात ७४७ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर-८८ हजार फोन
              पोलीस विभागाचा  १०० त्रनंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लाँकडाऊन च्या काळात या फोनवर  ८८,६२३ फोन आलेत्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
             तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६६२व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५८,७९२ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
            या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५५,७८४ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिस कोरोना कक्ष
            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४पुणे १सोलापूर शहर १नाशिक ग्रामीण १ अशा ७ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. ९१पोलीस अधिकारी व ७९६ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेतयाकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
रिलिफ कँम्प
            राज्यात एकूण ४०५० हजार रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,९५,५८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *