उस्मानाबाद – कृषि पधवीधर संघटना महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी अविनाश विष्णू कोळगे यांची निवड केली आहे. ही निवड संघटनेचे संस्थापक महेश कडूस पाटील यांच्याकडून केलेली आहे.
2012 पासून महाराष्ट्रात कार्यरत असणारी कृषि पधवीधर संघटना ही महाराष्ट्रातील कृषि व संलग्न बांधवांची सर्वाच्च संघटना आहे. शेतकरी व कृषि पधवीधर विद्यार्थी यांच्या विवीध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृषि पधवीधर संघटना प्रयत्नशील असते. संघटनेच्या माध्यमातून वृक्षरोपन, शेतक-यांना विवीध पीकांची माहिती,शेतकरी विद्यार्थ्यांचे प्रश्न, पीक रोगनियंत्रन, उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन, असे उपक्रम राबवले जातात.
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदधीका-यांकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.