बार्शी – भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) या महा संस्थेचा १ सप्टेंबर २०२२ रोजी ६७ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विमा रॅली आयोजित करण्यात आली होती.
सकाळी ९ वाजता नगर परिषद समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून सुरु होऊन विमा रॅली १०.3० वाजता LIC ऑफिस बार्शी येथे संपन्न झाली. रॅलीचे उदघाटन भारतीय आयुर्विमा महामंडळ, बार्शी शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी श्री. तुषार घाटगे सर यांचे हस्ते व सांगता शाखेचे वरिष्ठ सहाय्यक श्री. लक्ष्मण कुंभार सर यांच्या हस्ते झाली.
शाखेचे विकास अधिकारी श्री. उन्मेष पोतदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, ” विमा जनजागृती हाच या रॅली मागचा उद्देश आहे, कारण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे विमा ही देखील सर्वांची मूलभूत आर्थिक गरज आहे,.” रॅली मध्ये स्त्री विमा एजंट देखील बहुसंख्येने सामील होऊन त्यांचा घोषणा देण्यात सुध्दा विशेष पुढाकार होता.
विमा रॅली यशस्वी होण्यासाठी विमा प्रतिनिधी श्री. मारुती मोरे व सौ. कीर्ती कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.