Headlines

Salman Khan Affair: दारू पिऊन सलमान खाननं,ऐश्वर्याच्या घरी जाऊन केलं असं काही…त्यांनतर दोघे कायमचे दुरावले…

[ad_1]

Salman Khan Aishwarya Rai Bachchan Affair : बॉलिवूडचा भाईजान आणि सुपरस्टार सलमान खानला (salman khan in pathan)  पठाण (pathan) सिनेमात पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला होता, काल सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान (kisi ka bhai kisi ki jaan) या सिनेमाचा टिझर (kisi ka bhai kisi ki jaan teaser) लॉन्च करण्यात आला प्रेक्षकांना हा टीझर फार आवडला असून चाहते आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 
सलमान खानचे सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. आजही सलमान खानच्या चाहत्यांची कमी नाहीये वयाच्या 58 व्या वर्षीसुद्धा सलमान खानची क्रेझ बॉलीवूड मध्ये पाहायला मिळते. पण इतकं असूनही हा अभिनेता आजही सिंगल आयुष्य जगतोय. एक काळ होता जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेयरच्या चर्चानी (Salman Khan Aishwarya Rai Bachchan Affair) जोर धरला होता, दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या. दोघांची जोडीसुद्धा प्रेक्षकांना फार आवडू लागली होती. सलमान खान आणि त्याच्या अफेयर्सच्या नेहमीच चर्चा होतात पण सर्वात जास्त चर्चा झाली ते अफेयर म्हणजे अभिनेत्री मिस वर्ल्ड सध्याची बच्चन कुटुंबीयांची सून ऐश्वर्या राय बच्चनसोबतचे. (salman khan aishwarya rai bachchan affair)

सलमान आणि ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण

ऐश्वर्या आणि सलमान खान (salman khan) यांचं प्रेमप्रकरण हा आजही रंजकतेने वाचला जाणारा विषय आहे. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे असे वेगळे झाले कि आज एकमेकांचं तोंड पाहणंसुद्धा पसंत करत नाहीत. 

बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमप्रकरणं झाली. त्यांचं ब्रेकअप सुद्धा झालं पण आज ते एकमेकांचे फ्रेंड्स म्हणून वावरत आहेत . मग सर्वाना हा प्रश्न पडतो कि नेमकं असं काय झालं असावं कि ऐश्वर्या आणि सलमान आज असे जगताहेत. ( salman aishwarya brekup story that night what happened )

साल 1999 ‘हम दिल दे चुके सनम’  (hum dil de chuke sanam) रिलीज झाला चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतलं होत सलमान आणि ऐश्वर्याची जोडी सर्वाना आवडली होती. खऱ्या आयुष्यात सुद्धा दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटू लागला होता. दोघांचं प्रेम फुलू लागलं होत जवळपास तीन एक वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते पण अचानक एके रात्री असं काही घडलं कि दोघांचं आयुष्यच बदलून गेलं.. 

दोघेही लग्न करणार अश्या खूप बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या आणि अचानक ऐश्वर्याच्या स्टेटमेंट (Aishwarya statment against salman) ने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सलमान आपल्याला मारहाण करतो असं स्टेटमेंट ऐश्वर्याने मीडियासमोर दिलं आणि एकच खळबळ माजली असं म्हटलं जात ती रात्र दोघांच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती. ( AishwaryaRai birthday: salman aishwarya brekup story that night what happened )

नेमकं काय घडलं त्या रात्री

असं म्हटलं जात कि त्या रात्री सलमान खान खूप दारू पिऊन आला होता आणि ऐश्वर्याच्या घरी जाऊन तिच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारत होता.

यावेळी त्याच्या हातातून रक्तसुद्धा वाहत होत. काही प्रत्यक्षदर्शी असही सांगतात कि, यावेळी सलमान जोजोरात ओरडत होता दरवाजा उघडला नाही तर तो जीव देईल असाही म्हणत होता..

बराच वेळ हा हाय वोल्टेज drama सुरु होता. खूप वेळानंतर दरवाजा उघडण्यात आला सलमान आत गेला आणि त्यानंतर मात्र दोघे वेगळे झाले ते कायमचे.. ( salman aishwarya brekup story that night what happened)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *