Headlines

अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले ‘आजकालची मुलं…’

[ad_1]

Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor’s Relationships  : बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते बोनी कपूर यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले. आज त्यांची मुलं बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि त्यांच्या मागोमाग आता खुशी कपूर हे तिन्ही मुलं त्यांच्या वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. पण त्याशिवाय बोनी कपूर यांची मुलं त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. त्यात अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलांच्या रिलेशनशिपवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

बोनी कपूर यांनी ही मुलाखत ‘न्यूज 18’ ला दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलांच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलंय. त्यावेळी ते म्हणाले, “आजवर अशी वेळ कधी आली नाही जेव्हा मला त्यांना काही शिकवण्याची गरज भासली असेल. हे त्यांचं खासगी आयुष्य आहे. यावर मी त्यांच्याशी फक्त एक किंवा दोनवेळा बोलू शकतो आणि माझी प्रतिक्रिया देऊ शकतो. त्यांनी हे देखील सांगितलं की काही वेळा त्यांनी अर्जुन, जान्हवी आणि खुशीला त्यांच्या नात्याला मंजूरी दिली नाही, पण त्यांना सगळी परिस्थिती स्वत: हाताळायला सांगितली. हे आधीपासून असचं राहिलं आहे.” 

बोनी कपूर पुढे म्हणाले की “आमच्या पिढीच्या तुलनेत आजकालची मुलं ही खूप लवकर वयात येतात किंवा मच्युअर होतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर तुमचे विचार थोपवू शकत नाही किंवा तुम्हाला जे पाहिजे तसं त्यांनी करायला हवं असं सांगू शकत नाही. “

बोनी कपूर यांचा मोठा मुलगा अर्जुन कपूर हा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर त्यांची लेक जान्हवी कपूरनं कॉफी विथ करणच्या एका एपिसोड दरम्यान, शिखर पहाडियासोबतच्या रिलेशनशिपला न कळत कन्फर्म केलं होतं. तर खुशी कपूर ही तिचा सहकलाकार वेदांग रैनाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. तर अंशुला कपूर ही लेख रोहन ठक्करसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. 

हेही वाचा : ‘काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अन्…’, अमृता खानविलकरनं केलं अंकिता लोखंडेचं कौतुक

दरम्यान, बोनी कपूर यांनी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी आणि शिखर पहाडियाच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. “मला शिखर खूप आवडतो. जेव्हा तो जान्हवीसोबत नव्हता, तेव्हा पासून मी त्याला ओळखतो. मी आणि शिखर मित्र होतो. पण आता जान्हवी आणि शिखर गेल्या काही वर्षांपासून सोबत आहेत. जेव्हा जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा मला हे जाणवलं होतं की शिखर कधीच जान्हवीचा एक्स होणार नाही. मला माहित होतं की ते दोघं नेहमीच सोबत राहणार. शिखर कधीच जान्हवीला सोडणार नाही. जर त्यांच्यात वाद झालाच तरी शिखर, जान्हवीकडे परत येईल.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *